शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

नक्षलग्रस्त भागातील स्थानिकांना रोजगार देणार

By admin | Updated: August 22, 2015 02:59 IST

राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग खनिज संपत्तीच्या बाबतीत समृध्द आहे.

नक्षलग्रस्त भागाची आढावा बैठक :मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाहीनागपूर : राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग खनिज संपत्तीच्या बाबतीत समृध्द आहे. या खनिज संपत्तीचा उपयोग स्थानिक पातळीवरच केला जाईल. त्यासाठी या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योगाची निर्मिती करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सिव्हील लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या सभागृहात आयोजित नक्षलग्रस्त भागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, खासदार नाना पटोले, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजित कुमार, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, गडचिरोली पोलीस अधीक्षक संदीप पाटील, गोंदिया पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नक्षलग्रस्त भागात पोलीस विभाग आणि इतर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे नक्षल चळवळ कमजोर झाली आहे. ही योग्य संधी साधून या भागात उद्योजकांच्या माध्यमातून उद्योग निर्मितीवर भर देण्याचा शासनाचा विचार आहे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या खनिज संपत्तीमुळे येथे उद्योजक येण्यास तयार आहेत. त्यांनी उभारलेल्या प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाकडून सुरक्षेची हमी व संपूर्ण मदत दिली जाईल. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. गडचिरोली आणि गोंदिया या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे प्राधान्य आहे. सुरवातीला येथील नागरिकांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराची हमीसुध्दा देण्यात येईल. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी नक्षलग्रस्त भागातील खनिज संपत्तीचा व इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. (प्रतिनिधी) नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारणीसाठी पायलट प्रोजेक्ट तयार करा -नितीन गडकरी नक्षलग्रस्त भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्षलग्रस्त भागात उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबध्द आहे. उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने मागितलेली प्रत्येक मदत करण्यास केंद्र सरकार तयार आहे. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील सिरोंचा, एटापल्ली व अहेरी या तालुक्यांमध्ये स्थानिक खनिजांवर आधारीत उद्योग उभारणीसाठी पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात यावा, तसेच या उद्योगांसाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण स्थानिक युवक-युवतींना देऊन सुमारे १५ ते २० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना केली.