शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या धर्तीवर आठवडी बाजारांमधील समस्या दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मध्य प्रदेशमध्ये आठवडी बाजारातील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविला जात ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मध्य प्रदेशमध्ये आठवडी बाजारातील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविला जात आहे, याकडे महापालिकेचे लक्ष वेधून या धर्तीवर नागपुरातील आठवडी बाजारातील समस्या दूर करण्याचे निर्देश दिले. वर्तमान कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वत्र स्वच्छता राखणे आवश्यक आहे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१५ मध्ये न्यायालयाने वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली व याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. शहरातील कॉटन मार्केट, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, नेताजी मार्केट, गोकुलपेठ बाजार यासह विविध बाजारात बरेचदा घाण पसरलेली दिसते. खराब भाजीपाला मोकळ्या जागेवर फेकला जातो. बाजाराची नियमित सफाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. विविध आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांची गैरसोय होते. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता मध्य प्रदेशमधील आठवडी बाजारांचे उदाहरण दिले. त्या धर्तीवर नागपूरमधील आठवडी बाजारातील समस्या दूर करण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. त्याकरिता महानगरपालिकेने मध्य प्रदेशातील प्रशासनासोबत आवश्यक चर्चा करावी, असे न्यायालय म्हणाले.

-------------------

नीरीची मदत घेण्याची सूचना

न्यायालय मित्र अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजारातील अस्वच्छता व इतर समस्या दूर करण्यासाठी नीरीची मदत घेतली जाऊ शकते, असे सांगितले. यापूर्वी नीरीच्या शास्त्रज्ञांना बैठकीत बोलावून या विषयावर चर्चा करण्यात आली होती. त्यांनी योजनाही दिली होती, पण पुढे काहीच झाले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने मनपाला यासंदर्भात आवश्यक कृती करण्याचे निर्देश दिले.

------------------

जनजागृती आवश्यक

बाजारात स्वच्छता राहावी याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे, अशी भूमिका न्यायालयाने मांडली. तसेच, याकरिता बाजारात ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे. अशासकीय सामाजिक संस्थांना सोबत घेऊन स्वच्छतेचे कार्यक्रम आयोजित करावे, असे आदेश न्यायालयाने मनपाला दिले.

---------------

पुढील सुनावणी सभागृहात

आठवडी बाजारातील समस्यांवर सर्वांगीण चर्चा व्हावी व त्यातून प्रभावी उपाययोजना पुढे याव्यात, याकरिता न्यायालयाने या प्रकरणावर येत्या १६ मार्च राेजी उच्च न्यायालयाच्या सभागृहात पुढील सुनावणी निश्चित केली. त्या सुनावणीला सर्व संबंधित सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असेही न्यायालयाने सांगितले.

काय केले जाते मध्य प्रदेशमध्ये

मध्य प्रदेशमध्ये अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक राक्षस मशीनद्वारे बाजारासह शहरातून प्लास्टिक गोळा केले जाते. सफाईशी संबंधित वाहने इतर कचरा गोळा करतात. स्वच्छतेशी संबंधित समस्या कळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी जागृती केली जाते. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे फलक दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहेत. याशिवायही विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.