शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

ओबीसींचा राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाबाबत डेडिकेटेड ...

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाबाबत डेडिकेटेड आयोग स्थापन करून, ओबीसींचा डाटा गोळा करून माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करणार नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळणार नाही. तसेच केंद्र सरकारने सुद्धा घटनेत सुधारणा करण्याची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारवर दबाव वाढविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ व २७ जून रोजी लोणावळा येथे चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

महासंघातर्फे २४ जून रोजी सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. ओबीसींच्या राज्य सरकारकडून असलेल्या मागण्यासंदर्भात बोलताना तायवाडे म्हणाले की, २०२१ मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. केंद्र सरकार जर करीत नसेल तर राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये. ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी लावण्यात आलेली ८ लाखाची उत्पन्न मर्याद रद्द करावी, नॉन क्रिमिलेअर असलेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह करण्यात यावे, अशा ३४ मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या.

- केंद्राकडे महासंघाच्या मागण्या

ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.

संविधानात सुधारणा करून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्यात यावी.

पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे.

- चिंतन परिषदेला सर्वपक्षीय नेते राहणार उपस्थित

२६ व २७ जून रोजी होणाऱ्या चिंतन परिषदेला मंत्री छगन भूजबळ, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अण्णा डांगे, दत्तात्रय भरणे, संजय राठोड, एकनाथ खडसे, पंकजा मुंंडे हजर राहणार आहे. यात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे तायवाडे म्हणाले.