शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रिजन विकास आराखड्याच्या विरोधात एल्गार

By admin | Updated: November 1, 2015 03:15 IST

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)ने नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ७२० गावांचा समावेश करून मेट्रो रिजन विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे.

१५ डिसेंबरला मोर्चा : विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत निर्णयनागपूर : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)ने नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ७२० गावांचा समावेश करून मेट्रो रिजन विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. यात शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या आर्थिक हितासाठी शेतकऱ्यांचा अधिकार हिरावून जनतेवर विविध स्वरूपाचे कर लादले जाणार असल्याने ग्रामीण भागातील लोक उद्ध्वस्त होणार आहे. हा जनविरोधी विकास आराखडा हाणून पाडण्यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्याची घोषणा जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी केली.या संघटनेतर्फे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी चळवळीचे नेते चंद्रकांत वानखेडे होेते. प्रमुख वक्ते व विदर्भ विकास आघाडीचे अध्यक्ष नीरज खांदेवाले , विजयकुमार शिंदे, भंडारा को -आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अरुण वनकर व सुभाष बांते आदी व्यासपीठावर होते.२२ नोव्हेंबरला मेट्रो रिजन आराखड्यासंदर्भात प्रशिक्षण, २९ नोव्हेंबरला मेट्रो रिजन क्षेत्रातील गावात मतदान व १५डिसेंबर २०१५ ला विधानसभेवर मोर्चा काढण्याची घोषणा पवार यांनी केली. राज्यात भाजपची सत्ता आल्यास सात दिवसात नासुप्र बरखास्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासाठी त्यांनी मोर्चेही काढले होते. नासुप्रने विकास आराखडा इंग्रजीतून प्रसिद्ध केला आहे. तो शेतकऱ्यांना कसा समजणार. विकास आराखड्यातील आरक्षणामुळे जमीन एनए करता येत नाही. परंतु पैसे दिल्यास ती एनए करून मिळते. पैसे खाण्यासाठी हा आराखडा आहे का असा सवाल त्यांनी केला.आरक्षणापूर्वी ज्याची जमीन आहे. त्या शेतकऱ्यांना साधी विचारणाही नाही. आता या सरकारने शेतकरी दारुमुळे आत्महत्या करीत असल्याचा शोध लावल्याचा आरोप चंद्रकांत वानखेडे यांनी केला. मेट्रो रिजन विकास आराखडा नसून हा विनाश आराखडा आहे. यात शहर विकासाचा एकतर्फी विचार के ला आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांचा विचार केला नसल्याचे नीरज खांदेवाले यांनी सांगितले. या विकास आराखड्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे मूलभूत अधिकार हिरावले जाणार असल्याचे विजयकुमार शिंदे म्हणाले. अरुण वनकर यांनीही मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)