शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

राज्य सीमेवरच्या फुलझरी गावात पोहचलीच नाही वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचे फुलझरी गाव मागील कितीतरी वर्षापासून श्वापदांचे भय मनात ठेवून जगत आहे. ...

नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचे फुलझरी गाव मागील कितीतरी वर्षापासून श्वापदांचे भय मनात ठेवून जगत आहे. जंगलव्याप्त असलेल्या या गावामध्ये वीज वितरण कंपनीची वीज तर पोहचली नाहीच, पण सौर ऊर्जेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावेसेही अधिकाऱ्यांना वाटले नाही. परिणामत: सायंकाळ झाली की स्वत:ला घरात अंधारात कोंडून घेण्याशिवाय या गावकऱ्यांपुढे अन्य पर्याय उरलेला नाही.

रामटेक तालुक्यातील फुलझरी हे गाव तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतारावर आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या सुमारे ३०० लोकवस्तीच्या या गावामध्ये ४० ते ५० घरे आहेत. पेंच प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या या गावात पोहचण्यासाठी धड रस्ताही नाही. वनव्याप्त गाव असल्याने कसल्याही सुविधा गावात पोहचल्या नाहीत. नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या गावात वन कायद्याचा अडसर आल्याने कसल्याही सुविधा नाहीत. सायंकाळ झाली की श्वापदे गावात येतात. कधी धोका होईल सांगता येत नाही. त्यामुळे गावकरी अक्षरश: स्वत:ला रात्रभर घरात कोंडून घेतात.

या गावाच्या समस्यांसंदर्भात मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुडे म्हणाले, या गावकऱ्यांकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आहे. मतदानाला नेतेमंडळी गावात पोहचतात, मात्र सुविधांकडे लक्ष कुणाचेच नाही. वीज वितरण कंपनीकडे बरेचदा गावकऱ्यांसह निवेदने दिली. मात्र हा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पोहचलाच नाही. परिणामत: बफर झोनमधील अन्य गावात वीज पोहचूनही हे गाव मात्र वीज कंपनीच्या यादीवर आलेच नाही. दोन दिवसापूर्वी दुडे यांच्या पुढाकारात गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पुन्हा निवेदन देऊन गावात किमान सौर ऊर्जेवरील प्रकाशाची तरी व्यवस्था करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.

...

वन विभागाला करायचे आहे पुनर्वसन

हे गाव पेंचच्या बफर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाला या गावाचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र गावकऱ्यांचा याला विरोध आहे. गावालगत आपली शेती आहे. वन विभाग फक्त १० लाख रुपयाची नुकसान भरपाई देऊ पाहत आहे. त्यामुळे गाव सोडून जाण्यास गावकऱ्यांचा नकार आहे. या संघर्षात हे गावकरी सुविधांपासून दूर राहिले आहेत.

...