शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 15:38 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : मतदार सादुकर हटवार यांनी दाखल केली होती याचिका

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

ही याचिका मतदार सादुकर हटवार यांनी दाखल केली होती. सावरकर यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढण्याकरिता नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वारसदार, त्यांची मालमत्ता, स्वत:ची मालमत्ता, बँक खाती, गहाण मालमत्ता व विविध प्रकारच्या कर्जांची माहिती लपवून ठेवली. असे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैधपणे स्वीकारले.

सावरकर यांनी संबंधित माहिती लपवून ठेवल्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. परिणामी, ते ११ हजार ११६ मतांनी विजयी झाले. करिता, त्यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी व कामठी मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे हटवार यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांचे मुद्दे न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. हटवार यांच्यातर्फे ॲड. आर. एम. भांगडे, तर सावरकर यांच्यातर्फे ॲड. हरीश डांगरे यांनी कामकाज पाहिले.

मुद्दे मोघम, निराधार, अस्पष्ट

हटवार यांनी याचिकेमध्ये कोणतेही ठोस मुद्दे मांडले नाही. याचिकेतील सर्व मुद्दे मोघम, निराधार व अस्पष्ट स्वरूपाचे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत नाही. याशिवाय, हटवार यांनी याचिकेत दिलेली माहिती कुठून मिळविली, माहितीचा स्त्रोत काय आहे हे सांगितले नाही. याचिकेची दखल घ्यावी असे कोणतेच कारण रेकॉर्डवर उपलब्ध नाही, असे उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणCourtन्यायालय