शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१०९ गावांमधील भूजल पातळीसाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल अभियानांतर्गत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत करावयाच्या उपाययाेजनांबाबत माहिती देण्यासाठी भूवैज्ञानिकांनी ऑनलाईन कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. यात त्यांनी मार्गदर्शन करीत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित कार्यशाळेला वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. माने व भूवैज्ञानिक राजेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. अटल भूजल अभियानात काटाेल तालुक्यातील १०९ तर नरखेड तालुक्यातील १२३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी २६ नाेव्हेंबर २०२० पासून प्रयत्न सुरू केले आहेत. यात अती शोषित, शोषित व अंशतः शोषित पाणलाेट क्षेत्रातील गावांसाठी काही कमे मंजूर केली आहेत. या याेजनेचा कालावधी २०२४-२५ पर्यंत असणार आहे. निधी वितरणाच्या दृष्टीने हे अभियान पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. या सांकेतांचीही माहिती डाॅ. माने यांनी दिली. भूजल घसरण कशी थांबवावी, याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

राजेश गावंडे यांनी लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा कसा तयार करायचा, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक माहिती तसेच या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय बाबी व विभागाचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांनी मनरेगाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ‘लांजी पॅटर्न’नुसार शोषखड्डे तयार करावे. या अभियानात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रति गाव किमान ५० शोषखड्डे येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत खंडविकास अधिकारी संजय पाटील, सहायक भूवैज्ञानिक बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक बोरकर, उपअभियंता बावणे, जलसंधारण अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले हाेते. यावेळी विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक व इतर नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाही उत्तरेही भूवैज्ञानिकांनी दिली.

...

अभियानाचे पाच सांकेतांक

अटल भूजल अभियान निधी वितरण व कामाच्या दृष्टीने पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. यात भूजलसंबंधी माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, संबंधित विभागांच्या सहकार्याने विविध जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे यासह अन्य बाबींचा समावेश आहे. हे अभियान काटाेल व नरखेड तालुक्यातील डार्कशेडमध्ये असलेल्या २३२ गावांमध्ये राबविले जात आहे. यात लाेकसहभाग ही महत्त्वाची बाब आहे.