शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

१०९ गावांमधील भूजल पातळीसाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : काटाेल तालुक्यातील १०९ गावे डार्कशेडमध्ये असून, या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल अभियानांतर्गत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत करावयाच्या उपाययाेजनांबाबत माहिती देण्यासाठी भूवैज्ञानिकांनी ऑनलाईन कार्यशाळेचे आयाेजन केले हाेते. यात त्यांनी मार्गदर्शन करीत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

काटाेल पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित कार्यशाळेला वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. माने व भूवैज्ञानिक राजेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. अटल भूजल अभियानात काटाेल तालुक्यातील १०९ तर नरखेड तालुक्यातील १२३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी २६ नाेव्हेंबर २०२० पासून प्रयत्न सुरू केले आहेत. यात अती शोषित, शोषित व अंशतः शोषित पाणलाेट क्षेत्रातील गावांसाठी काही कमे मंजूर केली आहेत. या याेजनेचा कालावधी २०२४-२५ पर्यंत असणार आहे. निधी वितरणाच्या दृष्टीने हे अभियान पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. या सांकेतांचीही माहिती डाॅ. माने यांनी दिली. भूजल घसरण कशी थांबवावी, याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

राजेश गावंडे यांनी लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा कसा तयार करायचा, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक माहिती तसेच या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय बाबी व विभागाचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांनी मनरेगाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ‘लांजी पॅटर्न’नुसार शोषखड्डे तयार करावे. या अभियानात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रति गाव किमान ५० शोषखड्डे येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत खंडविकास अधिकारी संजय पाटील, सहायक भूवैज्ञानिक बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक बोरकर, उपअभियंता बावणे, जलसंधारण अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले हाेते. यावेळी विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक व इतर नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाही उत्तरेही भूवैज्ञानिकांनी दिली.

...

अभियानाचे पाच सांकेतांक

अटल भूजल अभियान निधी वितरण व कामाच्या दृष्टीने पाच सांकेतांकामध्ये विभागण्यात आले आहे. यात भूजलसंबंधी माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, संबंधित विभागांच्या सहकार्याने विविध जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे यासह अन्य बाबींचा समावेश आहे. हे अभियान काटाेल व नरखेड तालुक्यातील डार्कशेडमध्ये असलेल्या २३२ गावांमध्ये राबविले जात आहे. यात लाेकसहभाग ही महत्त्वाची बाब आहे.