शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले.

अनिल काकोडकर : तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांवर उपाययोजनांची गरजनागपूर : ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले. रायसोनी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘सेंट्रल’ प्रणालीपेक्षा समकक्ष समूहांच्या निर्मितीवर भर देण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षण संस्था असतानादेखील महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा का वाढताना दिसत नाही, यासंदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली. जास्त प्रमाणात महाविद्यालये असताना ‘सेंट्रल’ प्रणालीद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या दर्जावर परिणाम होतो व विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्घेच्या युगात यश मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यामुळेच ‘सेंट्रल’ प्रणालीऐवजी समकक्ष समूहांची स्थापना झाली पाहिजे. सुरुवातीला यात अनेक अडचणी येतील. परंतु कालांतराने सर्व सुरळीत होऊन शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल. या प्रक्रियेला वेळ दिला पाहिजे, असे काकोडकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, सर्वांच्याच राहणीमानावर त्याचा फरक पडतो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या फायद्यासोबतच दुष्परिणामांवर विचार करणे व उपाययोजना राबविण्याची गरज आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. (प्रतिनिधी) विज्ञानातून दूर होऊ शकते पाणीटंचाईदरवर्षी राज्यातील असंख्य गावांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आढळून येते. यंदादेखील पाऊस सरासरीहून कमी आल्यामुळे चिंता वाढली आहे. परंतु पाणीटंचाईवर विज्ञानातून मार्ग शोधल्या जाऊ शकतो. ‘आयसोटोप हायड्रोलॉजी’च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात ‘ग्राऊंडवॉटर’ची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. अशाच प्रकारच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘बीएआरसी’ व निरनिराळ्या कृषी महाविद्यालयांच्या संशोधनातून निरनिराळ्याडाळी, तेलबिया यांच्या सुधारित जाती विकसित करण्यात यश आले आहे. विज्ञानाच्या शक्तीचे हे चांगले उदाहरण आहे, असेदेखील ते म्हणाले. अणुऊर्जेच्या बाबतीत देश सातत्याने प्रगती करीत असून, येणारा काळ हा भारताचाच असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.