शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘सेंट्रल’ प्रणालीमुळे शिक्षणाचे नुकसान

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले.

अनिल काकोडकर : तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांवर उपाययोजनांची गरजनागपूर : ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले. रायसोनी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘सेंट्रल’ प्रणालीपेक्षा समकक्ष समूहांच्या निर्मितीवर भर देण्यात यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षण संस्था असतानादेखील महाविद्यालयांमधील शैक्षणिक दर्जा का वाढताना दिसत नाही, यासंदर्भात त्यांना विचारणा करण्यात आली. जास्त प्रमाणात महाविद्यालये असताना ‘सेंट्रल’ प्रणालीद्वारे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या दर्जावर परिणाम होतो व विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. केवळ पदवी घेऊन उपयोग नाही तर विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्घेच्या युगात यश मिळविण्यासाठी तयार करायला हवे. त्यामुळेच ‘सेंट्रल’ प्रणालीऐवजी समकक्ष समूहांची स्थापना झाली पाहिजे. सुरुवातीला यात अनेक अडचणी येतील. परंतु कालांतराने सर्व सुरळीत होऊन शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल. या प्रक्रियेला वेळ दिला पाहिजे, असे काकोडकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, सर्वांच्याच राहणीमानावर त्याचा फरक पडतो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या फायद्यासोबतच दुष्परिणामांवर विचार करणे व उपाययोजना राबविण्याची गरज आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. (प्रतिनिधी) विज्ञानातून दूर होऊ शकते पाणीटंचाईदरवर्षी राज्यातील असंख्य गावांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आढळून येते. यंदादेखील पाऊस सरासरीहून कमी आल्यामुळे चिंता वाढली आहे. परंतु पाणीटंचाईवर विज्ञानातून मार्ग शोधल्या जाऊ शकतो. ‘आयसोटोप हायड्रोलॉजी’च्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात ‘ग्राऊंडवॉटर’ची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. अशाच प्रकारच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘बीएआरसी’ व निरनिराळ्या कृषी महाविद्यालयांच्या संशोधनातून निरनिराळ्याडाळी, तेलबिया यांच्या सुधारित जाती विकसित करण्यात यश आले आहे. विज्ञानाच्या शक्तीचे हे चांगले उदाहरण आहे, असेदेखील ते म्हणाले. अणुऊर्जेच्या बाबतीत देश सातत्याने प्रगती करीत असून, येणारा काळ हा भारताचाच असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.