शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

लवकर निदानातूनच होऊ शकतो कर्करोगापासून बचाव

By admin | Updated: April 26, 2017 01:38 IST

कर्करोगाचे लवकर निदान झाले तर तो बरा होऊ शकतो हे नागरिकांना पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ समूह व ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’...

नागपूर : कर्करोगाचे लवकर निदान झाले तर तो बरा होऊ शकतो हे नागरिकांना पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ समूह व ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’ यांनी ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, डॉक्टरांसाठी ‘सीएमई’ यांच्या माध्यमातून ज्या लोकांना कर्करोग झाला आहे किंवा जे कर्करोगाच्या विळख्यातून बाहेर पडून आरोग्यदायी जीवन जगत आहेत, अशा लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कर्करोगावरील जागृतीच्या या राज्यस्तरीय उपक्रमात ‘लोकमत’ समूहासोबत जुळणे ही ‘कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’साठी गर्वाची बाब आहे. आपल्या देशात व विशेषत: राज्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे. जागतिक पातळीवर कर्करोगाचा दोन आघाड्यांवर सामना करण्यात येतो. अत्याधुनिक उपचार आणि कर्करोग टाळण्यासाठी तसेच निदान लवकर व्हावे यासाठी जागृती यावर भर देण्यात येत आहे. इतर आजारांप्रमाणे कर्करोगातदेखील उपचारापेक्षा बचाव जास्त महत्त्वाचा ठरतो. राज्यावरील कर्करोगाचे ओझे कमी व्हावे यासाठी जनजागृतीवर या उपक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आमचे तज्ज्ञ आणि तुमचा संपर्क यांच्या माध्यमातून कर्करोगासोबत लढा देऊन त्यावर विजय मिळविणे शक्य आहे’, असे मत कोकिळाबेन धीरुभाई अंबानी इस्पितळाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायण यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)