शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

रुग्णांना अन्नपुरवठा करण्यासाठी ई-रिक्षा येणार!

By admin | Updated: December 10, 2014 00:42 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहातील अन्न रुग्णापर्यंत पोहचतपर्यंत ते दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले.

उघड्या अन्नाचा अस्वच्छ रिक्षातून प्रवास प्रकरण : रिक्षांची स्वच्छता व पेंटिंग सुरूनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पाकगृहातील अन्न रुग्णापर्यंत पोहचतपर्यंत ते दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत हातरिक्षाऐवजी ई-रिक्षातून अन्नपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृह निर्माण करण्यात आले. याच पाकगृहातून सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्तासह दोन वेळेचे जेवण पुरविले जाते. यासाठी शासन दरमहा चार लाख रुपयांचे अनुदान देते. परंतु रुग्णांची संख्या पाहता हे अनुदान तटपुंजे आहे. यामुळे पौष्टिक आहार हा वरण-भात व जास्तीतजास्त वेळा भोपळ्याच्या भाजीपुराताच मर्यादित आहे. यातच १९८० पासून मांसाहार बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु या प्रवासात अन्न दूषित होत असल्याचे वास्तव समोर आले. पाकगृहाकडे स्वत:च्या दोन हातरिक्षा आहेत. याच रिक्षातून मेडिकलच्या विविध वॉर्डात, सुपर स्पेशालिटी आणि क्षयरोगाच्या वॉर्डात अन्न पुरविले जाते. परंतु मोडकळीस आलेले हे रिक्षे आतून मळकट व अस्वच्छ आहेत. यातच अन्नाच्या भांड्यावरील झाकणे अर्धवट उघडी तर काहींवर झाकणच नसते. पोळ्या तर उघड्यावरच ठेवलेल्या असतात. याचे वृत्त प्रसिद्ध होताच मेडिकल प्रशासनाने या हातरिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षाऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांची मदत घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव तयार करून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)