शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

‘ई-रिक्षा’ला मंजुरी कधी?

By admin | Updated: December 21, 2015 03:24 IST

एका कंपनीच्या ‘ई-रिक्षाला’ आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया, (एआरएआय) पुणे यांनी तीन महिन्यानपूर्वी योग्यता प्रमाणपत्र दिले होते.

शहरात धावतात ४०० वर ई-रिक्षा : आरटीओ कारवाईपासून दूरनागपूर : एका कंपनीच्या ‘ई-रिक्षाला’ आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया, (एआरएआय) पुणे यांनी तीन महिन्यानपूर्वी योग्यता प्रमाणपत्र दिले होते. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही या रिक्षा अधिकृतपणे धावणार होत्या. अशा वाहनांची नोंदणी करण्याचे पत्रही प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) प्राप्त झाले होते, परंतु मंजुरी मिळून दोन आठवडे होत नाही, तोच ‘ई-रिक्षा’ची नोंदणी करू नये, असे आदेश आल्याने याचा फटका उपराजधानीत धावत असलेल्या ४०० वर ई-रिक्षांनाही बसला, नेत्यांच्या दबावामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) या ई-रिक्षावर कारवाई करता येत नाही. परंतु या ई-रिक्षाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण किंवा कारवाई कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. राज्यात ई-रिक्षासाठी जोपर्यंत स्वतंत्र कायदा तयार होत नाही, वाहन तपासणी करणाऱ्या ‘एआरएआय’ या संस्थेकडून या रिक्षाची चाचणी होत नाही व योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत राज्यात ई-रिक्षावर बंदी घालण्यात आली होती. मात्र ‘एआरएआय’ या संस्थेने एका कंपनीची ‘आर-४’ प्रकाराच्या बॅटरीवर चालणाऱ्या ‘ई-रिक्षा’ची चाचणी करून या वाहनाला ‘रस्ता योग्यता प्रमाणपत्र’ दिले होते. यामुळे केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांची नोंदणी करण्याचे पत्र परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओला दिले. परंतु काहीच दिवसांत परिवहन आयुक्तांनी ‘ई-रिक्षा’ची नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश काढले. या वाहनाला कोणत्या संवर्गात परवाना देण्यात यावा तसेच कोणत्या कार्यक्षेत्रात परवानगी देण्यात यावी याबाबत निर्णय विचारधीन असल्याने मंजुरी मागे घेण्यात आल्याचे आरटीओ कार्यालयांना कळविण्यात आले होते. परंतु याला तीन महिन्यावर कालावधी होऊनही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आठवड्यात एक नवी ई-रिक्षा रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओ अडचणीत आले आहे. (प्रतिनिधी)ई-रिक्षाला विशिष्ट मार्गावर चालविण्याची योजना!आरटीओने नेमून दिलेल्या विशिष्ट मार्ग किंवा क्षेत्रातच ई-रिक्षा चालविण्याची परवानगी असणार आहे. असे असलेतरी, वाहनांची संख्या मर्यादित ठेवू नये, शेवटच्या ठिकाणापर्यंत वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही परिवहन विभागाने आरटीओला दिल्या होत्या. परंतु मंजुरीच नाकारल्याने पुढील अनेक आवश्यक बाबी थंडबस्त्यात पडल्या आहेत.