शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

‘ई-रिक्षा’ला मंजुरी कधी?

By admin | Updated: December 21, 2015 03:24 IST

एका कंपनीच्या ‘ई-रिक्षाला’ आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया, (एआरएआय) पुणे यांनी तीन महिन्यानपूर्वी योग्यता प्रमाणपत्र दिले होते.

शहरात धावतात ४०० वर ई-रिक्षा : आरटीओ कारवाईपासून दूरनागपूर : एका कंपनीच्या ‘ई-रिक्षाला’ आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया, (एआरएआय) पुणे यांनी तीन महिन्यानपूर्वी योग्यता प्रमाणपत्र दिले होते. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही या रिक्षा अधिकृतपणे धावणार होत्या. अशा वाहनांची नोंदणी करण्याचे पत्रही प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) प्राप्त झाले होते, परंतु मंजुरी मिळून दोन आठवडे होत नाही, तोच ‘ई-रिक्षा’ची नोंदणी करू नये, असे आदेश आल्याने याचा फटका उपराजधानीत धावत असलेल्या ४०० वर ई-रिक्षांनाही बसला, नेत्यांच्या दबावामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) या ई-रिक्षावर कारवाई करता येत नाही. परंतु या ई-रिक्षाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण किंवा कारवाई कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. राज्यात ई-रिक्षासाठी जोपर्यंत स्वतंत्र कायदा तयार होत नाही, वाहन तपासणी करणाऱ्या ‘एआरएआय’ या संस्थेकडून या रिक्षाची चाचणी होत नाही व योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत राज्यात ई-रिक्षावर बंदी घालण्यात आली होती. मात्र ‘एआरएआय’ या संस्थेने एका कंपनीची ‘आर-४’ प्रकाराच्या बॅटरीवर चालणाऱ्या ‘ई-रिक्षा’ची चाचणी करून या वाहनाला ‘रस्ता योग्यता प्रमाणपत्र’ दिले होते. यामुळे केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांची नोंदणी करण्याचे पत्र परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओला दिले. परंतु काहीच दिवसांत परिवहन आयुक्तांनी ‘ई-रिक्षा’ची नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश काढले. या वाहनाला कोणत्या संवर्गात परवाना देण्यात यावा तसेच कोणत्या कार्यक्षेत्रात परवानगी देण्यात यावी याबाबत निर्णय विचारधीन असल्याने मंजुरी मागे घेण्यात आल्याचे आरटीओ कार्यालयांना कळविण्यात आले होते. परंतु याला तीन महिन्यावर कालावधी होऊनही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे आठवड्यात एक नवी ई-रिक्षा रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओ अडचणीत आले आहे. (प्रतिनिधी)ई-रिक्षाला विशिष्ट मार्गावर चालविण्याची योजना!आरटीओने नेमून दिलेल्या विशिष्ट मार्ग किंवा क्षेत्रातच ई-रिक्षा चालविण्याची परवानगी असणार आहे. असे असलेतरी, वाहनांची संख्या मर्यादित ठेवू नये, शेवटच्या ठिकाणापर्यंत वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही परिवहन विभागाने आरटीओला दिल्या होत्या. परंतु मंजुरीच नाकारल्याने पुढील अनेक आवश्यक बाबी थंडबस्त्यात पडल्या आहेत.