शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ई-पॉस मशीन पडताहेत बंद, धान्य वाटपात अडचणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात वाढत्या कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मे महिन्यात राज्य सरकारने नि:शुल्क धान्य वाटपाची घोषणा केली, तर केंद्र सरकारनेसुद्धा मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहेत. मशीनच्या या तांत्रिक बिघाडामुळे धान्य वाटपात अनेक अडचणी येत आहेत. वेळेत धान्य वाटप करणे कठीण जात आहे. परिणामी अनेकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. या अडचणीमुळे रेशन दुकानदारही त्रस्त झाले असून, ते याबाबत अन्न व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आहेत. परंतु विभागातील अधिकारी मूकदर्शक बनले आहेत.

ई-पॉस मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून धान्य वाटप केले जाते. ई-पॉश मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाचा धान्याचा कोटा येतो. या प्रक्रियेनंतर मशीन लगेच बिल दाखविते. परंतु सध्या ई-पॉश मशीन बिल दाखवितच नाही आहे. दुकानदारांचे म्हणणे आहे की, सात ते आठवेळा प्रयत्न केल्यानंतर मशीनमध्ये बिल दर्शविले जाते. परंतु लगेच मशीन बंद पडते. बिलशिवाय धान्य वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रान्झक्शनची माहिती देता येत नाही. परिणामी किती धान्य वाटप झाले ते माहीत होणार नाही. यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते धान्य वाटप करू शकत नाही आहेत. अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत आहे.

बॉक्स

दोन महिन्याच्या धान्य वितरणामुळे वाढला लोड

कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिकांनी एप्रिल महिन्याचे धान्य उचलले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्याचे धान्य एकाच वेळी वाटप केले जात आहे. कदाचित यामुळेच ई-पॉश मशीनमध्ये लोड वाढला आहे. यापूर्वीही अशा अडचणी आलेल्या आहेत.

बॉक्स

पीएम योजनेचा कोटाही दाखवीत नाही आहे

कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यासाठी प्रति व्यक्ती पाच किलो धान्य वाटप केले जात आहे. परंतु मशीनमध्ये पीएम योजनेच्या धान्याचा कोटाही दर्शविला जाात नाही आहे. यामुळे या योजनेचाही लाभही नागरिकांना मिळत नाही आहे.

कोट

अधिकारी करताहेत दुर्लक्ष

तांत्रिक अडचण, सर्व्हर डाऊन आदी समस्यांबाबत विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात आहे. परंतु ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी संबंधित एजन्सीसमोर या अडचणी ठेवून त्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे. परंतु अधिकारी केवळ मूकदर्शक बनले आहेत.

- संजय पाटील, अध्यक्ष

विदर्भ राशनभाव दुकानदार/केरोसिन विक्रेता संघटना