शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

१३ दिवसांत २० हजार दुचाकीस्वारांवर ‘ई’ कारवाई

By admin | Updated: October 21, 2016 02:41 IST

उपराजधानीत आता विना हेल्मेट वाहन चालविणे शक्य नाही. ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे.

हेल्मेट सक्तीला वेग : आता चौकाचौकांत राबणार विशेष मोहीमनागपूर : उपराजधानीत आता विना हेल्मेट वाहन चालविणे शक्य नाही. ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे. परिणामी १३ दिवसांत १९ हजार ९२१ वाहनचालकांना ‘ई-चालान’ पाठविण्यात आले. यातच गुरुवारपासून चौकाचौकांमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी तीन हजारावर वाहनचालक दोषी आढळले.दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. उपराजधानीत याची सक्ती आठ फेब्रुवारीपासून करण्यात आली. एकाच दिवशी सात हजारावर वाहनचालकांवर कारवाई झाली. परंतु हेल्मेटविषयी जनजागृती न करता व हेल्मेट विकत घेण्यास मुदत न दिल्याने याला विरोध झाला. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल केली होती. परंतु नंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. मात्र यात विनाहेल्मेट वाहनचालकांना थांबविल्यानंतर अनेकवेळा वाद व्हायचा. चालान फाडून शुल्क आकारण्यापर्यंत वेळ जायचा. यावर उपाययोजना म्हणून ६ आॅक्टोबरपासून ‘ई-चालान’ सुरू करण्यात आले. या प्रणालीत विना हेल्मेट दुचाकीस्वाराचा त्याच्या नंबरप्लेटसह फोटो काढला जातो. नंतर ते चालान त्याच्या घरी पाठविल्या जाते. यामुळे आता जास्तीतजास्त वाहनांवर कारवाई करणे शक्य झाले आहे.(प्रतिनिधी)