शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पाण्याविना धूळवड!

By admin | Updated: March 26, 2016 02:34 IST

होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही.

नागपूर : होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच होळीमध्येच लाखो लिटर पाणी वाया जाते. परंतु यंदाचे वर्ष हे भीषण पाणीटंचाईचे आहे. नागपुरात टंचाई नसली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. यावेळी पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून कोरडी होळी खेळून पाणी वाचवण्यासंबंधी आवाहने करण्यात आली होते. नागपूरकरांनीही याला चांगली साद देत एक आदर्श घालून दिला आहे. शहरात अनेक ठिकाणी गुलालासोबत कोरडी होळी खेळून नागपूकरांनी लाखो लिटर पाण्याची बचत केली. रंगांची उधळणसुद्धा झाली, परंतु त्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आला. राज्यात इतर भागात दुष्काळ आहे. नागरिकांनाही याची कल्पना आहे. यामुळेच प्रशासनिक स्तरापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. नागरिकांना रंग न खेळता गुलालाची कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून आदर्श निर्माण केला. शहरात नेटवर्क परिसरात पाणीपुरवठा करणारी कंपनी ओसीडब्ल्यू आणि नॉन नेटवर्क परिसरात मनपा जलप्रदाय विभागातर्फे पाणीपुरवठा केला जातो. होळीच्या दिवशी एकही टँकर रस्त्यावर धावले नाही. शुक्रवारी नेटवर्क परिसरात टँकरच्या ६५० फेऱ्या आणि नॉन नेटवर्क परिसरात १९०० फेऱ्या झाल्याची माहिती आहे. याच प्रकारे २५५० टँकरच्या फेऱ्या झाल्या. दररोज इतक्याच फेऱ्या टँकर लावत असतात. एका टँकरमध्ये ४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. यापेक्षा अधिक क्षमतेचे टँकर सुद्धा आहेत. याची बेरीच केली तर लाखो लिटर पाण्याची एकाच दिवशी बचत झाली.