शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सोयीबीनची आवक घटल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका ...

- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक

नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका बसल्याने कळमन्यात जानेवारीच्या अखेरपर्यंत भरपूर प्रमाणात होणारी सोयाबीनची आवक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमी झाली आहे. दुसरीकडे धानाची आवक वाढली आहे. सोयाबीनची आवक कमी झाल्याने कळमन्यात व्यवसायावर परिणाम झाला असून व्यापारी आणि अडतियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, नवरात्रीपासून सोयाबीन आवक सुरू होते. पण यावर्षी प्रारंभीपासूनच कमी होती. मुहूर्तावर शेतकऱ्यांना ४५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. माल खराब आल्याने नंतर भाव कमी झाले. तसे पाहता हमीभाव ३८६२ रुपये आहे. पण ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. मिल मालकांना माल कमी मिळाल्याने खाद्यतेलाचे भाव वाढले. आता आवक कमी असून दर्जानुसार ३९०० ते ४२०० रुपये भाव मिळत आहेत. गेल्यावर्षीच्या २५०० पोत्यांच्या तुलनेत दररोज ७०० ते ८०० पोत्यांची आवक आहे. पुढे आणखी कमी होईल. नवीन सोयाबीन निघेपर्यंत अनेक शेतकरी भाव जास्त मिळण्याच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवतात. त्यामुळे सोयाबीनची आवक वर्षभर असते. सात ते आठ वर्षांपूर्वी दररोज १५ ते २० हजार पोत्यांची आवक व्हायची. तेव्हा शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० क्विंटल सोयाबीन व्हायचे. पण आता ते दिवस गेले आहेत.

घाटोळे म्हणाले, सध्या धान बाजारात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुसळधार पाऊस आणि किडीमुळे फटका बसला आहे. अनेक शेतकरी अटींची पूर्तता न झाल्याने शासनाच्या सेंटरवर माल न नेता कळमन्यात आणत आहेत. त्यामुळे त्यांना ५०० रुपये बोनसला मुकावे लागत आहे. कळमन्यात सध्या दररोज ९ ते १० हजार पोत्यांची आवक आहे. हमी भाव १८६५ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना २ हजार ते २४०० रुपये भाव मिळत आहे.

फेब्रुवारीमध्ये गहू आणि मार्च महिन्यात तूर कळमन्यात विक्रीसाठी येणार आहे. तसे पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रत्येक कृषी मालाची आवक कमी-कमी होत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. अनेक शेतकरी खुल्या बाजारात माल विक्रीसाठी नेत असल्याचा फटका व्यापारी आणि अडतियांना बसत आहे. हीच स्थिती राहिल्यास दुसरा व्यवसाय शोधावा लागेल, असे घाटोळे यांनी स्पष्ट केले.