शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सोयीबीनची आवक घटल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका ...

- व्यवसायावर परिणाम : धानाची १० हजार पोत्यांपर्यंत आवक

नागपूर : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पिकाला फटका बसल्याने कळमन्यात जानेवारीच्या अखेरपर्यंत भरपूर प्रमाणात होणारी सोयाबीनची आवक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कमी झाली आहे. दुसरीकडे धानाची आवक वाढली आहे. सोयाबीनची आवक कमी झाल्याने कळमन्यात व्यवसायावर परिणाम झाला असून व्यापारी आणि अडतियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, नवरात्रीपासून सोयाबीन आवक सुरू होते. पण यावर्षी प्रारंभीपासूनच कमी होती. मुहूर्तावर शेतकऱ्यांना ४५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. माल खराब आल्याने नंतर भाव कमी झाले. तसे पाहता हमीभाव ३८६२ रुपये आहे. पण ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. मिल मालकांना माल कमी मिळाल्याने खाद्यतेलाचे भाव वाढले. आता आवक कमी असून दर्जानुसार ३९०० ते ४२०० रुपये भाव मिळत आहेत. गेल्यावर्षीच्या २५०० पोत्यांच्या तुलनेत दररोज ७०० ते ८०० पोत्यांची आवक आहे. पुढे आणखी कमी होईल. नवीन सोयाबीन निघेपर्यंत अनेक शेतकरी भाव जास्त मिळण्याच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवतात. त्यामुळे सोयाबीनची आवक वर्षभर असते. सात ते आठ वर्षांपूर्वी दररोज १५ ते २० हजार पोत्यांची आवक व्हायची. तेव्हा शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० क्विंटल सोयाबीन व्हायचे. पण आता ते दिवस गेले आहेत.

घाटोळे म्हणाले, सध्या धान बाजारात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुसळधार पाऊस आणि किडीमुळे फटका बसला आहे. अनेक शेतकरी अटींची पूर्तता न झाल्याने शासनाच्या सेंटरवर माल न नेता कळमन्यात आणत आहेत. त्यामुळे त्यांना ५०० रुपये बोनसला मुकावे लागत आहे. कळमन्यात सध्या दररोज ९ ते १० हजार पोत्यांची आवक आहे. हमी भाव १८६५ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना २ हजार ते २४०० रुपये भाव मिळत आहे.

फेब्रुवारीमध्ये गहू आणि मार्च महिन्यात तूर कळमन्यात विक्रीसाठी येणार आहे. तसे पाच ते सहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रत्येक कृषी मालाची आवक कमी-कमी होत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. अनेक शेतकरी खुल्या बाजारात माल विक्रीसाठी नेत असल्याचा फटका व्यापारी आणि अडतियांना बसत आहे. हीच स्थिती राहिल्यास दुसरा व्यवसाय शोधावा लागेल, असे घाटोळे यांनी स्पष्ट केले.