शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

सततच्या पावसामुळे साेयाबीनचे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : सततच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले साेयाबीनचे पीक खराब झाले आहे. या प्रकारामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : सततच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले साेयाबीनचे पीक खराब झाले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याची शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, शासनाने या नुकसानग्रस्त शेतातील पिकाचा पंचनामा करून याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

कामठी तालुक्यात यावर्षी साेयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली हाेती. यावर्षी तालुक्यात एकूण ३,८३४ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात व मध्यंतरी साेयाबीनच्या पिकांची अवस्था उत्तम हाेती. चांगली फूल व फलधारणा झाल्याने साेयाबीनचे बऱ्यापैकी उत्पादन हाेणार असल्याची आशाही शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली हाेती.

दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पाण्याचा वेळीच निचरा न झाल्याने आठवडाभरात साेयाबीनचे पीक पिवळे पडायला व काही भागात सडायला सुरुवात झाली आहे. फलधारणा झालेल्या पिकाच्या शेंगा काळवंडल्या असून, त्या सडून गळत आहे. तर फुलावर असलेले पिकाचा बहारही गळाला आहे. त्यामुळे या साेयाबीनला फलधारणा हाेण्याची शक्यता मावळली आहे.

या प्रकारामुळे तालुक्यातील बहुतांश साेयाबीन उत्पादक हवालदिल झाले आहे. शासनाने या संपूर्ण नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी खैरीचे सरपंच मोरेसर कापसे, लिहीगावचे सरपंच गणेश झोड, घोरपडच्या सरपंच तारा कडू, येरखेड्याच्या सरपंच मंगला कारेमोरे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्णा साबळे, नेरीचे सरपंच अरुण आखरे, खेडीच्या सरपंच भारती देवगडे, आडक्याच्या सरपंच भावना चांभारे, वडाेद्याच्या सरपंच वनिता इंगोले, खसाळ्याचे सरपंच रवी पारधी, भमेवाड्याच्या सरपंच सविता फुकट, आवंढीच्या सरपंच शालू मोहोड, नेरीचे माजी सरपंच डुमदेव नाटकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

उत्पादन खर्च वाढला

यावर्षी साेयाबीनच्या पिकावर मध्यंतरी राेग व किडींचा प्रादुर्भाव झाला हाेता. या राेग व किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली हाेती. प्रत्येक शेतकऱ्याने साेयाबीनच्या पिकावर दाेन ते तीन फवारण्या केल्या आहेत. त्यातच मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक सडल्यागत झाले आहे. त्यामुळे एकीकडे उत्पादनखर्च वाढला असून, उत्पादनात कमालीची घट हाेणार आहे. यावर्षी साेयाबीनचा उत्पादनखर्च भरून निघणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

...

साेयाबीनचे घटते क्षेत्र

सात वर्षापूर्वी कामठी तालुक्यात १० हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. त्यानंतर राेग व किडींचा प्रादुर्भाव तसेच परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या पिकांचे नुकसानीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे तालुक्यातील साेयाबीनचा पेरा कमी हाेत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीन पेरणी क्षेत्र थाेडे वाढले हाेते. मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे आठवडाभरात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

...

सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली हाेती. सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच जमिनीत पाण्याचा वेळीच याेग्य निचरा हाेत नसल्याने पिकाची मुळे सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडून शेंगा गळत आहे.

- मंजुषा राऊत,

तालुका कृषी अधिकारी, कामठी.