शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

सततच्या पावसामुळे साेयाबीनचे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : सततच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले साेयाबीनचे पीक खराब झाले आहे. या प्रकारामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : सततच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले साेयाबीनचे पीक खराब झाले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याची शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, शासनाने या नुकसानग्रस्त शेतातील पिकाचा पंचनामा करून याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

कामठी तालुक्यात यावर्षी साेयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली हाेती. यावर्षी तालुक्यात एकूण ३,८३४ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात व मध्यंतरी साेयाबीनच्या पिकांची अवस्था उत्तम हाेती. चांगली फूल व फलधारणा झाल्याने साेयाबीनचे बऱ्यापैकी उत्पादन हाेणार असल्याची आशाही शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली हाेती.

दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पाण्याचा वेळीच निचरा न झाल्याने आठवडाभरात साेयाबीनचे पीक पिवळे पडायला व काही भागात सडायला सुरुवात झाली आहे. फलधारणा झालेल्या पिकाच्या शेंगा काळवंडल्या असून, त्या सडून गळत आहे. तर फुलावर असलेले पिकाचा बहारही गळाला आहे. त्यामुळे या साेयाबीनला फलधारणा हाेण्याची शक्यता मावळली आहे.

या प्रकारामुळे तालुक्यातील बहुतांश साेयाबीन उत्पादक हवालदिल झाले आहे. शासनाने या संपूर्ण नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी खैरीचे सरपंच मोरेसर कापसे, लिहीगावचे सरपंच गणेश झोड, घोरपडच्या सरपंच तारा कडू, येरखेड्याच्या सरपंच मंगला कारेमोरे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्णा साबळे, नेरीचे सरपंच अरुण आखरे, खेडीच्या सरपंच भारती देवगडे, आडक्याच्या सरपंच भावना चांभारे, वडाेद्याच्या सरपंच वनिता इंगोले, खसाळ्याचे सरपंच रवी पारधी, भमेवाड्याच्या सरपंच सविता फुकट, आवंढीच्या सरपंच शालू मोहोड, नेरीचे माजी सरपंच डुमदेव नाटकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

उत्पादन खर्च वाढला

यावर्षी साेयाबीनच्या पिकावर मध्यंतरी राेग व किडींचा प्रादुर्भाव झाला हाेता. या राेग व किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली हाेती. प्रत्येक शेतकऱ्याने साेयाबीनच्या पिकावर दाेन ते तीन फवारण्या केल्या आहेत. त्यातच मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक सडल्यागत झाले आहे. त्यामुळे एकीकडे उत्पादनखर्च वाढला असून, उत्पादनात कमालीची घट हाेणार आहे. यावर्षी साेयाबीनचा उत्पादनखर्च भरून निघणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

...

साेयाबीनचे घटते क्षेत्र

सात वर्षापूर्वी कामठी तालुक्यात १० हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. त्यानंतर राेग व किडींचा प्रादुर्भाव तसेच परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या पिकांचे नुकसानीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे तालुक्यातील साेयाबीनचा पेरा कमी हाेत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीन पेरणी क्षेत्र थाेडे वाढले हाेते. मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे आठवडाभरात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

...

सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली हाेती. सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच जमिनीत पाण्याचा वेळीच याेग्य निचरा हाेत नसल्याने पिकाची मुळे सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडून शेंगा गळत आहे.

- मंजुषा राऊत,

तालुका कृषी अधिकारी, कामठी.