शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

औषध तुटवड्यावर ‘जेनेरिक’चा डोज!

By admin | Updated: May 22, 2015 02:56 IST

आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते.

नागपूर : आजघडीला प्रत्यक्ष आजारापेक्षा त्यावरचा उपचारच जास्त मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटते. या वाढत्या महागाईच्या काळात अनेक नागरिक परवडत नाहीत म्हणून औषधे न घेताच रोग आणि आजार सहन करतात. यातच शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्यामुळे सामान्य रुग्णांना औषध मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मेडिकलने जेनेरिक औषधांचा वापर करण्याचा विचार सुरू केला आहे. औषधांचे थकीत बिल आणि अधिष्ठात्यांचे साहित्य खरेदीचे अधिकार वाढविल्यास हे शक्य होणार आहे. अन्न-वस्त्र-निवाऱ्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी डॉक्टरांचे शुल्कासह औषधांच्या किमती परडवत नाही, परिणामी शासकीय रुग्णालयाची वाट धरतात. परंतु येथेही अनेक औषधी बाहेरून घ्यावी लागत असल्याने रुग्ण अडचणीत येतो. यातच औषध पुरवठादारांची बिले थकल्यास औषधांचा तुटवडा आणखी बिकट होतो. यावर उपाय म्हणून बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या सर्वच रुग्णांना औषध उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकल प्रशासन जेनेरिक औषधांची मदत घेण्याच्या विचारात आहे. सध्या मेडिकलचे औषध पुरवठाधारकांचे १६ कोटींचे बिल थकीत आहे. ते मिळाल्यास आणि अधिष्ठात्यांना ५० लाखांपर्यंत साहित्य खरेदी करण्याचे अधिकार वाढविल्यास ही योजना सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेमुळे रोजची दोन हजार रुग्णांची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) वाढून चार हजार होण्याची शक्यता आहे. जेनेरिक औषध गरिबांसाठी जणू प्राण वाचविणारी ‘संजीवनी’ ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत व्हावी म्हणून जनमंचने नागपुरात पहिले जेनेरिक्स औषध उपलब्ध करून महत्त्वाची सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नागपूर मेडिकल कॉलेजचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘प्रिस्क्रिप्शन’ लिहून देताना जेनेरिक औषधे लिहनू द्यावी, असे फर्मान काढले होते, परंतु या योजनेचे पालनच झाले नाही. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी आता ही योजना आणली आहे. ती किती यशस्वी होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)