शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

दुष्काळाची झळ सर्वच गावांना

By admin | Updated: December 31, 2014 01:03 IST

राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे.

सुधारित अहवाल : सर्वच पिकांना फटकानागपूर: राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे. त्याचा फटका खरीप पिकांच्या उत्पादनाला बसला असल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१३-१४ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १७९५ खरीप गावांपैकी ५२५ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी होती आणि १२७० गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त होती. मात्र ज्या गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त होती ती गावेही सुधारित पैसेवारी काढण्याच्या वेळेपर्यंत दुष्काळी गावाच्या यादीत समाविष्ट होतील अशी शक्यताही वर्तविण्यात आली होती. दरम्यान राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने शासनाने केंद्राकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी केली होती. त्यासाठी सुधारित पैसेवारीची गरज होती. मात्र ती १५ जानेवारीपर्यंत येत असल्याने तोेपर्यंत थांबणे शक्य नव्हते कारण शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी सार्वत्रिक मागणी होती. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन १५ जानेवारीची वाट न पाहता खरीप पिकांची स्थिती लक्षात घेऊन अंदाजे सुधारित आणेवारी ३० डिसेंबरपूर्वी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नागपूर जिल्हा प्रशासनाने सुधारित पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खरीप गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच गावात दुष्काळाचा फटका पिकांना बसला असून त्यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली. संपूर्ण राज्यातून प्राप्त झालेल्या सुधारित पैसेवारीच्या आधारावर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा सुधारित प्रस्ताव सादर करणार आहे. या अहवालाचा आधार घेतला तर केंद्राकडून मिळणारी मदत ही सर्वसमावेशक राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)