शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

दुष्काळाची झळ सर्वच गावांना

By admin | Updated: December 31, 2014 01:03 IST

राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे.

सुधारित अहवाल : सर्वच पिकांना फटकानागपूर: राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पैसेवारीच्या संदर्भात सुधारित अहवाल राज्य शासनाला पाठविला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच खरीप गावांना दुष्काळाची झळ बसली आहे. त्याचा फटका खरीप पिकांच्या उत्पादनाला बसला असल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१३-१४ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १७९५ खरीप गावांपैकी ५२५ गावांची पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी होती आणि १२७० गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त होती. मात्र ज्या गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त होती ती गावेही सुधारित पैसेवारी काढण्याच्या वेळेपर्यंत दुष्काळी गावाच्या यादीत समाविष्ट होतील अशी शक्यताही वर्तविण्यात आली होती. दरम्यान राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने शासनाने केंद्राकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मागणी केली होती. त्यासाठी सुधारित पैसेवारीची गरज होती. मात्र ती १५ जानेवारीपर्यंत येत असल्याने तोेपर्यंत थांबणे शक्य नव्हते कारण शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी सार्वत्रिक मागणी होती. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन १५ जानेवारीची वाट न पाहता खरीप पिकांची स्थिती लक्षात घेऊन अंदाजे सुधारित आणेवारी ३० डिसेंबरपूर्वी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नागपूर जिल्हा प्रशासनाने सुधारित पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खरीप गावांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच गावात दुष्काळाचा फटका पिकांना बसला असून त्यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली. संपूर्ण राज्यातून प्राप्त झालेल्या सुधारित पैसेवारीच्या आधारावर राज्य शासन केंद्राकडे मदतीचा सुधारित प्रस्ताव सादर करणार आहे. या अहवालाचा आधार घेतला तर केंद्राकडून मिळणारी मदत ही सर्वसमावेशक राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)