शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

डॉ. बबनराव तायवाडे यांचा राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

नागपूर : राज्य सरकारने सर्व प्रक्रिया केली तरी ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहणार नाही. त्यामुळे आता केंद्र ...

नागपूर : राज्य सरकारने सर्व प्रक्रिया केली तरी ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहणार नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहे. मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असूनही जर ओबीसींना न्याय देऊ शकत नसेल तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपण आपल्या सदस्त्वाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. बबनराव तायवाडे यांनी बुधवारी जाहीर केले.

तायवाडे म्हणाले, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करून आपण आपला निर्णय त्यांना कळविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे. ओबीसींना हा मोठा धक्का आहे. राज्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कायम रहावे यासाठी राज्य सरकारने हालचाली करत राज्य मागासवर्ग आयोग नेमला. आयोगाने इम्पिरिकल टाडा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया केली तरी २७ टक्के आरक्षण कायम राहणार नाही, हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संविधानाच्या कलम २४३ डी व टी नुसार पंचायत समिती तसेच महानगरपालिकांना आरक्षण दिले आहे. त्यातील पोटकलम ६ मध्ये सुधारणा करून ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. सोबतच केंद्राने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी व ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही डॉ. तायवाडे यांनी केली.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापणार

- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. सोबतच एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे. अशात आता डॉ. तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. तायवाडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता आरक्षणाच्या मुद्द्यावर महासंघासह विविध ओबीसी संघटनाही आक्रमक भूमिका घेणार आहेत.

असा आहे आयोग

- राज्य मागासवर्ग आयोगात अध्यक्षांसह एकूण ११ सदस्य आहेत. आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश ए.व्ही. निरगुडे तर सदस्य सचिव दत्ता देशमुख आहेत. याशिवाय ९ सदस्य आहेत. आजवर आयोगाच्या पाच बैठका झाल्या आहेत.