शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाला भग्नावस्था ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST

नागपूर : अंबाझरी तलाव आणि उद्यानाजवळील ज्या ठिकाणी १९७६ पासून आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा जल्लाेष साजरा केला, त्या डाॅ. बाबासाहेब ...

नागपूर : अंबाझरी तलाव आणि उद्यानाजवळील ज्या ठिकाणी १९७६ पासून आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा जल्लाेष साजरा केला, त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा श्वासच काेंडायला लागला आहे. महामानवाच्या नावाचा वारसा जपणाऱ्या या भवनाची अक्षरश: भग्नावस्था झाली आहे. याचा फायदा घेत रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने भवनाचा गाेदामासारखा वापर करून आंबेडकरी विचारांची मुस्कटदाबी चालविली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाण ठेवून नागपूर महापालिकेने १९७६ साली अंबाझरी उद्यानाजवळ १८.८६ एकर परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली हाेती. तेव्हापासून हे भवन आंबेडकरी चळवळीचे, बाैद्ध परिषदा, सभा, संमेलनाचे केंद्र ठरले हाेते. तलावाजवळच्या शांत, निसर्ग रमणीय परिसरातील हे भवन अनेक वर्षे लाेकाेपयाेगी कार्याने उत्साहित असायचा. मात्र, साल २००० नंतर जणू या भवनाला अवकळा आली. मनपा प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भवनाची दुरवस्था झाली आणि हे भवन आज एखाद्या भग्न इमारतीप्रमाणे उभे आहे. काही वर्षांपूर्वी भवनाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने बजेटमध्ये ५० लक्ष रुपये निर्धारित केले हाेते. मात्र, पुढे काय झाले पत्ता नाही. या भवनाचा कायापालट करून लाेकाेपयाेगी कार्यासाठी खुले करण्याचे आश्वासन मागे महापाैरांनी दिले हाेते; पण त्यानंतर काही झाले नाही. परिस्थिती आता अशी झाली की अंबाझरी ते अमरावती राेड या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने या भवनाचा गाेदामासारखा वापर करून बांधकाम साहित्य येथे ठेवणे चालविले आहे. मात्र, त्याकडेही गांभीर्याने लक्ष घातले गेले नाही. एवढेच नाही तर माेकाट कुत्रे, जनावरांचा हैदाेस येथे चाललेला असताे.

बौद्ध आंबेडकरी रिपब्लिकन विचारधारेच्या समाजधुरिणांच्या प्रयत्नाने, प्रबोधनाने व सामाजिक कला व सांस्कृतिक विचारधारेच्या पदस्पर्शाने साकारलेल्या या वास्तूचे नूतनीकरण करून हे ऐतिहासिक व अविस्मरनीय स्थळ विकसित करावे, अशी मागणी समता सैनिक दल, दी बुद्धिष्ट सोसायटी आफ इंडिया, सहयोग मित्र परिवार, सामाजिक संघटन रिपब्लिकन मूव्हमेंट, स्त्रीभूषण रमाई आबेडकर संस्था, नागपूर शहर विकास मंच, परिवर्तन विचार मंच आदी संघटनांनी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त केली आहे.