शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

डीपीसीने गत वर्षीच केली शिफारस

By admin | Updated: August 31, 2015 02:43 IST

जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षीच शासनाला केली असल्याची बाब उघडकीस आली आहे,

दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा : झारीतील शुक्राचार्य कोण ? नागपूर : जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने गेल्या वर्षीच शासनाला केली असल्याची बाब उघडकीस आली आहे, असे असताना दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी कशी काय घोषित करण्यात आली. यातील झारीतील शुक्राचार्य कोण,असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीक्षाभूमीचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन त्याला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासंदर्भात होत असलेली मागणी लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महानगरपालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. ३० जून २०१४ रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दीक्षाभूमी व हजरत ताजुद्दीन बाबा दर्गा यावर चर्चा करण्यात आली. या दोन्ही स्थळांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले.दीक्षाभूमीला दरवर्षी १० लाख लोक भेट देतात. तेव्हा त्याचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन दीक्षाभूमीसह हजरत बाबा दर्गाला अ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस जिल्हा नियोजन समितीने शासनाकडे केली. जिल्हा नियोजन समितीने अ श्रेणी दर्जा देण्याची शिफारस केली असताना शासनाने ब श्रेणीचा दर्जा का दिला तसेच यातील झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्य शासनाने शिर्डी व सिद्धीविनायक मंदिराला अ श्रेणीचा दर्जा बहाल केला आहे. त्याचे स्वागत आहे मात्र ज्या दीक्षाभूमीवर देशातीलच नव्हे तर जगातील लाखो लोक येतात. येथे येऊन नवीन ऊर्जा घेऊन जातात. त्या दीक्षाभूमीला ‘अ ’श्रेणीचा दर्जा का दिला गेला नाही. पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या दीक्षाभूीला अ श्रेणीचा दर्जा तातडीने मिळायलाच हवा. त्याचबरोबर मुंबईतील चैत्यभूमीला सुद्धा तसाच दर्जा दिला जावा. यासंदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. खा. रामदास आठवले - अध्यक्ष-रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)आता तातडीने कार्यवाही व्हावी दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणई मी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. आ. विकास कुंभारे यांनी त्यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा लेखी आश्वासन देत जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्याचे आश्वासन दिले होते. त्या आधारावर जिल्हा नियोजन समितीने दीक्षाभूमीला अ श्रेणीचा दर्जा देण्याची शिफारस गेल्या वर्षी केली होती. ही शिफारस आधीच केली आहे. त्यामुळे पुन्हा डीपीसीमध्ये प्रस्ताव आणण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव तातडीने मागवून दीक्षाभूमीला अ श्रेणीचा दर्जा देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. भूषण दडवे , शहर उपाध्यक्ष - भाजपा