शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शेतकऱ्यावर दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

शेतात नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना जिवे मारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांच्या हातून चुकीने वन्यप्राणी मारले गेल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ...

शेतात नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना जिवे मारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांच्या हातून चुकीने वन्यप्राणी मारले गेल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. यावर गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना इजा पोहोचविल्यास तुरुंगाची वाट, वन्यप्राण्यांनी शेतातील पिके फस्त केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

---

प्रत्यक्षात नुकसान मोठे

कळमेश्वर तालुक्यात गत सहा वर्षांत ९८९ शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई शासनाकडून आर्थिक मदतीच्या स्वरूपात उचलली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून झालेले आहे. ज्यांना वनविभागाचे नियम व अटी माहिती आहेत असे शेतकरी वनविभागाकडे अर्ज दाखल करून नुकसान भरपाई मिळवितात; परंतु ज्यांना या नियमांचे ज्ञान नाही असे शेतकरी वनविभागापर्यंत पोहोचण्यास टाळाटाळ करतात. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्यास प्रत्यक्षरीत्या नुकसानीचा एक मोठा आकडा समोर येईल.

अशी झाली भरपाई

कालावधी प्रकरणे नुकसानभरपाई

एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ १७७ १७,२०,१५० रुपये

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ १५९ १४,८०,३३२ रुपये

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ १७७ १२,६३,६५८ रुपये

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ १२४ २०,३४,६३५ रुपये

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० १९० १८,०८,८३६ रुपये

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ १६२ १२,५२,९०८ रुपये