शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नुसते परीक्षण नको, फळगळतीवर उपाय सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक फळगळतीने हवालदिल झाला आहे. उपलब्ध औषध फवारणी करूनही फळगळती थांबत ...

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक फळगळतीने हवालदिल झाला आहे. उपलब्ध औषध फवारणी करूनही फळगळती थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा, याकडे लक्ष वेधणारे वृत्त लोकमतने गत शनिवारी प्रकाशित केले होते. याच दिवशी काटोल येथे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची काटोल येथे आढावा बैठकी झाली. तीत शेतकऱ्यांनी फळगळतीकडे केदार यांचे लक्ष वेधले होते. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी केदार यांनी सोमवारी (दि. २३) रोजी नागपूर येथे कृषी विभागाची बैठक घेतली.

या बैठकीत फळगळतीवर उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर गत तीन दिवसांपासून काटोल आणि नरखेड तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञ फळ बागा अक्षरशः पिंजून काढताना दिसून येत आहे. या फळगळतीचे कारण वातावरणातील बदल व कमी पाऊस तसेच योग्य प्रकारे खत पुरवठा न झाल्याने असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फळगळ गत चार वर्षांपासून सुरू आहे. यंदा हिरवे फळसुद्धा गळती होऊन पडत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारचे औषध फवारणी आतापर्यंत करण्यात आली. परंतु गळ थांबली नसल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यासोबतच वातावरण एवढा कोणता मोठा बदल झाला असा प्रश्नसुद्धा शेतकरी यावेळी विचारताना दिसून आले. यावर संशोधक मात्र निरुत्तर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषितज्ज्ञांनी बागांचे निरीक्षण करण्यासोबतच संत्रा-मोसंबीची गळती कशी थांबविता येईल, यावर तातडीने उपायोजना सांगाव्यात, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे. या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. रमाकांत गजभिये, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. मोहन पाटील, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, डॉ. योगेश धार्मिक, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. एकता बागडे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, शेतकऱ्यांच्या वतीने डॉ.अनिल ठाकरे, प्रगतिशील शेतकरी दिनेश ठाकरे, मनोज जवंजाळ उपस्थित होते.

---

संत्रा व मोसंबीच्या उत्पादकांना दोन्ही बहरात फळगळतीचा सामना करावा लागत आहे. यंदाही हीच परिस्थिती आहे. औषध फवारणी करूनही तोडगा निघत नाही. कृषी विभागाचे अधिकारी फळगळ पाहणी करीत आहे. त्यांनी यावर तातडीने उपाययोजना सुचवाव्यात.

- ज्ञानेश्वर मुळेकर, शेतकरी

260821\img-20210825-wa0213.jpg

तालुक्यातील संत्रा बागायतीतील फळगळीची पाहणी करतांना कृषी संशोधक