शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रोजगार चालण्यासाठी पर्यावरणीय मापदंडाकडे दुर्लक्ष नको - श्रीकांत टेकाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे निसर्ग आणि मानवतेच्या अस्तित्वाला नवा दृष्टिकोन मिळाला आहे. असे असले तरी रोजगाराच्या ...

नागपूर : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे निसर्ग आणि मानवतेच्या अस्तित्वाला नवा दृष्टिकोन मिळाला आहे. असे असले तरी रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी पर्यावरणीय मापदंड कमी होण्याची शक्यता आहे, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञ श्रीकांत टेकाडे यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात टेकाडे यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होते. दरवर्षी एक वृक्ष सुमारे १५५ किलो प्राणवायू निर्माण करतो. एक एकर जंगलातून सुमारे २.४ टन कार्बन डायऑक्‍साईड काढून टाकला जातो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करावा लागेल.

विकासासाठी औद्योगिकीकरण आणि रोजगार हे महत्त्वाचे आहेतच परंतु शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन, कचरा व्यवस्थापन, वनोद्याने, वनीकरण इत्यादीसारख्या वन आणि पर्यावरणीय प्रकल्पातून रोजगाराचे नवे मार्ग निर्माण केले जावे, असा पर्याय त्यांनी सुचविला आहे.

कोरोनाच्या काळामध्ये औद्योगिक आणि वाहतूक कार्यास विराम दिल्यामुळे हवेच्या गुणवत्तेच्या मापदंडात लक्षणीय सुधारणा दिसून आली. व्यवसायाच्या सुलभतेसाठी पर्यावरणाचे निकष सौम्य करण्याऐवजी जमिनीचा वापर, वन्यजीव, प्रदूषण इत्यादी संदर्भातील नियम मजबूत केले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.