शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

पर्यवेक्षिय यंत्रणेतील बहुतांश पदे रिक्त : कोण सोडविणार तक्रारी ? नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम ...

पर्यवेक्षिय यंत्रणेतील बहुतांश पदे रिक्त : कोण सोडविणार तक्रारी ?

नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबविण्याच्या घोषणा शासनाकडून होत असतात. ते उपक्रम यशस्वीपणे राबविल्या जावे यासाठी आटापिटा पण केला जातो. परंतु या उपक्रमाकरिता मार्गदर्शन व प्रभावी पर्यवेक्षण करणारी शिक्षण विभागाची पर्यवेक्षिय यंत्रणा कुबड्यांवर सुरू आहे. दुसरीकडे कोरोनामुळे पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. शिक्षकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शिक्षण विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने तक्रारी सोडविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच नाही तर नागपुरात विभागीय शिक्षण मंडळ (बोर्ड), शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी), प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्रादेशिक विज्ञान प्राधिकरण या महत्वाचा शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. एकंदरीत विभागाचा कार्यभार प्रभारींवर आहे.

- जिल्ह्यातील शाळा

शासकीय शाळा - १५३०

अनुदानित शाळा - १२०२

विनाअनुदानित शाळा - ११५५

२) शिक्षण विभागात रिक्त पदे वाढली

एकूण पदे रिक्त पदे

शिक्षणधिकारी - २ १

उपशिक्षणाधिकारी - ६ ५

गट शिक्षणाधिकारी - १३ १०

केंद्र प्रमुखांची रिक्त पदे १३६ १००

विस्तार अधिकारी ५४ ३४

- तक्रारींचे स्वरुप....

पालकांच्या तक्रारी

आरटीई प्रवेशाच्या तक्रारी, आरटीईसाठी पालकांकडून मागितले जातात पैसे, शाळांनी वाढविली फी, गणवेश घालून ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना बसवा, फी नाही भरली म्हणून ऑनलाईन वर्ग केले बंद, पुस्तके शाळेतूनच घ्या, अ‍ॅक्टिव्हीटीचे शुल्क द्या.

शिक्षकांच्या तक्रारी

जीपीएफ, ग्रॅज्युएटी मिळाली नाही. सेवापुस्तके अद्ययावत नाही. मेडिकलचे बिल मिळाले नाही. प्रवास भत्ता मिळत नाही, वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती, शाळेत शिकवायचे की लसीकरण करायचे

- पालक प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी काय म्हणतात

- गेल्या ८ ते ९ वर्षापासून मी पालकांच्या प्रश्नांचा शिक्षण विभागासोबत पाठपुरावा करीत आहे. शिक्षण विभागात एका एका अधिकाऱ्याकडे चार चार जागेचा प्रभार आहे. अधिकाऱ्यांचीही कामे वाढली आहे. त्यामुळे तक्रारी सुटतच नाही.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

- प्रशासकीय कामे विलंबाने होत आहे. शिक्षकांना वारंवार विभागाच्या चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे काम होत नाही. सहनियंत्रण होत नाही. मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा फटका संपूर्ण यंत्रणेलाच बसतो आहे.

शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना