शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

पर्यवेक्षिय यंत्रणेतील बहुतांश पदे रिक्त : कोण सोडविणार तक्रारी ? नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम ...

पर्यवेक्षिय यंत्रणेतील बहुतांश पदे रिक्त : कोण सोडविणार तक्रारी ?

नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबविण्याच्या घोषणा शासनाकडून होत असतात. ते उपक्रम यशस्वीपणे राबविल्या जावे यासाठी आटापिटा पण केला जातो. परंतु या उपक्रमाकरिता मार्गदर्शन व प्रभावी पर्यवेक्षण करणारी शिक्षण विभागाची पर्यवेक्षिय यंत्रणा कुबड्यांवर सुरू आहे. दुसरीकडे कोरोनामुळे पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. शिक्षकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शिक्षण विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने तक्रारी सोडविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच नाही तर नागपुरात विभागीय शिक्षण मंडळ (बोर्ड), शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (डीआयईसीपीडी), प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्रादेशिक विज्ञान प्राधिकरण या महत्वाचा शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. एकंदरीत विभागाचा कार्यभार प्रभारींवर आहे.

- जिल्ह्यातील शाळा

शासकीय शाळा - १५३०

अनुदानित शाळा - १२०२

विनाअनुदानित शाळा - ११५५

२) शिक्षण विभागात रिक्त पदे वाढली

एकूण पदे रिक्त पदे

शिक्षणधिकारी - २ १

उपशिक्षणाधिकारी - ६ ५

गट शिक्षणाधिकारी - १३ १०

केंद्र प्रमुखांची रिक्त पदे १३६ १००

विस्तार अधिकारी ५४ ३४

- तक्रारींचे स्वरुप....

पालकांच्या तक्रारी

आरटीई प्रवेशाच्या तक्रारी, आरटीईसाठी पालकांकडून मागितले जातात पैसे, शाळांनी वाढविली फी, गणवेश घालून ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना बसवा, फी नाही भरली म्हणून ऑनलाईन वर्ग केले बंद, पुस्तके शाळेतूनच घ्या, अ‍ॅक्टिव्हीटीचे शुल्क द्या.

शिक्षकांच्या तक्रारी

जीपीएफ, ग्रॅज्युएटी मिळाली नाही. सेवापुस्तके अद्ययावत नाही. मेडिकलचे बिल मिळाले नाही. प्रवास भत्ता मिळत नाही, वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती, शाळेत शिकवायचे की लसीकरण करायचे

- पालक प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी काय म्हणतात

- गेल्या ८ ते ९ वर्षापासून मी पालकांच्या प्रश्नांचा शिक्षण विभागासोबत पाठपुरावा करीत आहे. शिक्षण विभागात एका एका अधिकाऱ्याकडे चार चार जागेचा प्रभार आहे. अधिकाऱ्यांचीही कामे वाढली आहे. त्यामुळे तक्रारी सुटतच नाही.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

- प्रशासकीय कामे विलंबाने होत आहे. शिक्षकांना वारंवार विभागाच्या चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे काम होत नाही. सहनियंत्रण होत नाही. मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा फटका संपूर्ण यंत्रणेलाच बसतो आहे.

शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना