शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

एक महिन्याचा पगार वर्षभर पुरतो का?

By admin | Updated: December 11, 2014 00:48 IST

केवळ महिना-दीड महिना खूप झाले तर दोन-अडीच महिने शासनाकडून मिळणारे काम करायचे. उर्वरित कालावधीत रिकामे राहायचे. त्यामुळे केवळ मिळालेल्या महिना-दीड महिन्याच्या पगारावर

फवारणी कामगारांचा सवाल : कायम सेवेत घेण्याची मागणीगणेश खवसे - नागपूरकेवळ महिना-दीड महिना खूप झाले तर दोन-अडीच महिने शासनाकडून मिळणारे काम करायचे. उर्वरित कालावधीत रिकामे राहायचे. त्यामुळे केवळ मिळालेल्या महिना-दीड महिन्याच्या पगारावर कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न हिवताप विभागातील अस्थायी फवारणी कामगारांनी उपस्थित केला आहे. शासनाने सेवेत कायमस्वरूपी घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी या कामगारांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. आरोग्य सेवेंतर्गत हिवताप विभागात फवारणीच्या कामासाठी कामगारांचा उपयोग करण्यात येतो. फवारणी मोहीम जेवढे दिवस चालते तेवढ्या दिवसाचे-महिन्याचे वेतन त्यांना देण्यात येते. यासाठी त्यांना शासनाच्या सर्व सुविधा देण्यात येतात. भत्तासुद्धा दिला जातो. परंतु ही मोहीम दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस चालत नाही. त्यामुळे एक-दोन महिन्याच्या वेतनाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत हे कामगार राहतात. फवारणीचे काम करणारे कामगार अनेक वर्षांपासून त्याच पदावर कार्यरत आहेत. मात्र ते सेवेत कायम झालेले नाहीत, त्यांना निवृत्ती वेतनही मिळत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा कोणताच आर्थिक स्रोत नसतो. ही बाब लक्षात घेता फवारणी कामगारांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेण्यात यावे, त्यांना नियमित काम देण्यात यावे, नियमित पगार देण्यात यावा, सेवानिवृत्त कामगारांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब देण्यात यावी आदी मागण्या या कामगारांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन केले जात आहे. त्यात अरुण नक्षिणे, राजू कापुरे, राजेंद्र शिरसाट, बबन जाधव, कृपाकर हाडगे, सीताराम देशपांडे, जयराम ठोसरे, बाबा डबरासे, कृष्णा घरत, नारायण पाटील, प्रभाकर पाटील, दिगांबर पाटील, अनिल घरत, यशवंत शिरसाट, जनार्दन पाटील, अनंत निंबरे, सुभाष भांबरे, धनाजी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, उका जाधव, परशुराम घरत, अभिमन इंदासराव, शांताराम नेरकर, देऊ फडके, सुरेश सोनवणे, गोपीनाथ म्हात्रे, गोविंद शिरसाट, राजेंद्र कटरे आदी सहभागी झाले आहेत. शासन निर्णय नको; कृती करा!फवारणी कामगारांना शासनाच्या सेवेत घेण्यासंदर्भात आतापर्यंत अनेकदा शासन निर्णय झाले. २७ जुलै १९८२, १५ जानेवारी १९९१, २०००, २००३ यासह अनेकदा बैठकीतही चर्चा करण्यात आली. शासकीय सेवेत घेऊन त्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी फवारणी कामगार शासकीय सेवेत ‘कायम’ होऊ शकले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. यासोबतच केवळ शासन निर्णय नको तर प्रत्यक्षात कृती करा, असे मत कामगारांनी नोंदविले.