शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन लादता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, ...

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मनपा आयुक्तांनी तसे आदेश सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात रुग्णाच्या घरी जाऊन कुठलीही खातरजमा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे सारेच बिनधास्त वावरत आहेत.

कर्मचाऱ्यांवर मार्च एण्डचा ताण

- मार्च महिना सुरू आहे. सर्व शासकीय विभागांवर तसेच आर्थिक लेखाविषयक सेवा देणाऱ्या खासगी आस्थापनांवरही मार्च एण्डचा ताण आहे. अशात खरच या आस्थापना फक्त २५ टक्के उपस्थितीत काम करतील व ७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरी आराम करू देणार आहेत का? याची पडताळणी करणारी प्रत्यक्ष व्यवस्था प्रशासनाने उभारलेली नाही.

..............

बाधितांना घरपोच औषधी नाही

- गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांना मनपाद्वारे घरपोच आवश्यक औषधांचा पुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु रुग्णांना औषध मिळत नाही. त्यामुळे बाधित औषधासाठी घराबाहेर पडतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.

......

क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

- शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार विचारात घेता मनपा प्रशासनाने क्वारंटाइन सेंटरची संख्या वाढविण्याची गरज होती. पाचपावली व व्हीएनआयटी येथे क्वारंटाइन सेंटर सुरू आहे. मात्र, आवश्यक सुविधा नसल्यामुळे रुग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिली. खर्च वाचविण्यासाठी महापालिकेनेही क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यावर भर दिला नाही.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

- २३ एप्रिलपासून बारावीच्या तर त्यानंतर दहावीच्या परीक्षा आहेत. बहुतांश ट्यूशन क्लासेस ऑनलाइन आहेत. मात्र, शिक्षकांना ऑनलाइन शिकविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा क्लासमध्ये आहेत. आता लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद ठेवली तर संबंधित शिक्षकांना घरूनच ऑनलाइन शिकवावे लागेल. मात्र, शिक्षकांकडे मोबाइलशिवाय कुठलीही सुविधा नाही. याचा परिणाम अध्यापनावर होऊ शकतो. याचा फटका परीक्षा तोंडावर असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर नक्कीच होईल. याचाही प्रशासनाने विचार करायला हवा.

-------------------------------------

केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- केंद्र सरकारने साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक बघता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त