शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन लादता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, ...

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मनपा आयुक्तांनी तसे आदेश सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात रुग्णाच्या घरी जाऊन कुठलीही खातरजमा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे सारेच बिनधास्त वावरत आहेत.

कर्मचाऱ्यांवर मार्च एण्डचा ताण

- मार्च महिना सुरू आहे. सर्व शासकीय विभागांवर तसेच आर्थिक लेखाविषयक सेवा देणाऱ्या खासगी आस्थापनांवरही मार्च एण्डचा ताण आहे. अशात खरच या आस्थापना फक्त २५ टक्के उपस्थितीत काम करतील व ७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरी आराम करू देणार आहेत का? याची पडताळणी करणारी प्रत्यक्ष व्यवस्था प्रशासनाने उभारलेली नाही.

..............

बाधितांना घरपोच औषधी नाही

- गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांना मनपाद्वारे घरपोच आवश्यक औषधांचा पुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु रुग्णांना औषध मिळत नाही. त्यामुळे बाधित औषधासाठी घराबाहेर पडतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.

......

क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

- शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार विचारात घेता मनपा प्रशासनाने क्वारंटाइन सेंटरची संख्या वाढविण्याची गरज होती. पाचपावली व व्हीएनआयटी येथे क्वारंटाइन सेंटर सुरू आहे. मात्र, आवश्यक सुविधा नसल्यामुळे रुग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिली. खर्च वाचविण्यासाठी महापालिकेनेही क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यावर भर दिला नाही.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

- २३ एप्रिलपासून बारावीच्या तर त्यानंतर दहावीच्या परीक्षा आहेत. बहुतांश ट्यूशन क्लासेस ऑनलाइन आहेत. मात्र, शिक्षकांना ऑनलाइन शिकविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा क्लासमध्ये आहेत. आता लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद ठेवली तर संबंधित शिक्षकांना घरूनच ऑनलाइन शिकवावे लागेल. मात्र, शिक्षकांकडे मोबाइलशिवाय कुठलीही सुविधा नाही. याचा परिणाम अध्यापनावर होऊ शकतो. याचा फटका परीक्षा तोंडावर असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर नक्कीच होईल. याचाही प्रशासनाने विचार करायला हवा.

-------------------------------------

केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- केंद्र सरकारने साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक बघता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त