शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन लादता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, ...

- गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड तसेच पोलीस कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मनपा आयुक्तांनी तसे आदेश सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात रुग्णाच्या घरी जाऊन कुठलीही खातरजमा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. गृहविलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची उदाहरणे नाहीत. त्यामुळे सारेच बिनधास्त वावरत आहेत.

कर्मचाऱ्यांवर मार्च एण्डचा ताण

- मार्च महिना सुरू आहे. सर्व शासकीय विभागांवर तसेच आर्थिक लेखाविषयक सेवा देणाऱ्या खासगी आस्थापनांवरही मार्च एण्डचा ताण आहे. अशात खरच या आस्थापना फक्त २५ टक्के उपस्थितीत काम करतील व ७५ टक्के कर्मचाऱ्यांना घरी आराम करू देणार आहेत का? याची पडताळणी करणारी प्रत्यक्ष व्यवस्था प्रशासनाने उभारलेली नाही.

..............

बाधितांना घरपोच औषधी नाही

- गृह विलगीकरणातील कोरोनाबाधितांना मनपाद्वारे घरपोच आवश्यक औषधांचा पुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु रुग्णांना औषध मिळत नाही. त्यामुळे बाधित औषधासाठी घराबाहेर पडतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.

......

क्वारंटाइन सेंटरवर सुविधांचा अभाव

- शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व गृह विलगीकरणातील रुग्णांचा मुक्त संचार विचारात घेता मनपा प्रशासनाने क्वारंटाइन सेंटरची संख्या वाढविण्याची गरज होती. पाचपावली व व्हीएनआयटी येथे क्वारंटाइन सेंटर सुरू आहे. मात्र, आवश्यक सुविधा नसल्यामुळे रुग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिली. खर्च वाचविण्यासाठी महापालिकेनेही क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यावर भर दिला नाही.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान

- २३ एप्रिलपासून बारावीच्या तर त्यानंतर दहावीच्या परीक्षा आहेत. बहुतांश ट्यूशन क्लासेस ऑनलाइन आहेत. मात्र, शिक्षकांना ऑनलाइन शिकविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा क्लासमध्ये आहेत. आता लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद ठेवली तर संबंधित शिक्षकांना घरूनच ऑनलाइन शिकवावे लागेल. मात्र, शिक्षकांकडे मोबाइलशिवाय कुठलीही सुविधा नाही. याचा परिणाम अध्यापनावर होऊ शकतो. याचा फटका परीक्षा तोंडावर असलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर नक्कीच होईल. याचाही प्रशासनाने विचार करायला हवा.

-------------------------------------

केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- केंद्र सरकारने साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक बघता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्राच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही.

- राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त