शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका

By admin | Updated: May 30, 2016 02:16 IST

नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा.

नितीन गडकरी : एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पणनागपूर : नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर उद्योगांनी करू नये, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.नरेंद्रनगर भागातील पीएमजी कॉलनी येथे जपानच्या कंपनीने प्रतिदिन १० हजार लिटर क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होेते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा.अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, जपानच्या डायको एक्सेस कंपनीचे संचालक हिरोशी ओगमे, प्रबंधक रुई ओवेसा आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे नाल्यातील पाण्याचा उद्यानासाठी पुनर्वापर केला जाणार आहे. शहरातील उद्यानासाठी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. दूषित पाण्याचा पुनर्वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामासाठी न करता दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करावा. महापालिका अशा स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करीत आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करताना त्यापासून मिथेन गॅस व सीएनजी गॅस निर्माण होईल. भांडेवाडी येथे अशा स्वरुपाचा प्रकल्प उभारला जात आहे. यावर शहरातील बसेस चालणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मदत होणार असल्याचे गडकरी म्हणाले.या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज १० हजार लिटर दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. महापालिकेने येथे टाकी निर्माण केली आहे. यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रकाश तोतवानी, अतिरिक्त उपायुक्त संजय काकडे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मो. इसराईल यांनी तर संचालन अविनाश ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुरेश भजे यांनी मानले. (प्रतिनिधी)