शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध म्हणूनच ओळख प्रस्थापित करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. बौद्ध म्हणणूनच स्वत:ची ओळख प्रस्थापित करा. तसेच सरकारने सुद्धा दलित-नवबौद्ध याचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे कार्यकारी अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेनुसार देशात बौद्धांची लोकसंख्या ८४ लाख इतकी सांगितली जात आहे. ती चुकीची आहे. ही संख्या कितीतरी अधिक आहे. यासाठी आपण स्वत: बौद्धांची जनगणना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात तफावत आढळून आल्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू असून देशभरात शाळा कॉलेज उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.संस्था सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त२१ जून २०१३ रोजी न्यायालयाने अशोक आंबेडकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर संस्थेवरील मीराताई आंबेडकर यांचा दावा फेटाळण्यात आला असून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ही सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त झाली आहे, असा दावाही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी केला.ज्योतीकर हे विहिंपचे कार्यकर्तेसंस्थेचे विश्वस्त पी.जी. ज्योतीकर हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त असलेला व्यक्ती अगदी विरोधाभासी असलेल्या संस्थेत कसे काय काम करू शकतो. त्यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाला भाजपा व विहिंपच्य दावनीला बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्योतीकर यांना विश्वस्त पदावरून काढण्यासाठी न्यायालयीन कारवाई केली जात असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी केले संस्थेच्या घटनेचे उल्लंघनप्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला भेट दिली. त्यांची ही भेट राजकीय नेता म्हणून योग्य असली तरी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांना या उल्लंघनाबद्दल संस्थेचे सदस्य होता येणार नसल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.