शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध म्हणूनच ओळख प्रस्थापित करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. बौद्ध म्हणणूनच स्वत:ची ओळख प्रस्थापित करा. तसेच सरकारने सुद्धा दलित-नवबौद्ध याचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे कार्यकारी अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेनुसार देशात बौद्धांची लोकसंख्या ८४ लाख इतकी सांगितली जात आहे. ती चुकीची आहे. ही संख्या कितीतरी अधिक आहे. यासाठी आपण स्वत: बौद्धांची जनगणना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात तफावत आढळून आल्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू असून देशभरात शाळा कॉलेज उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.संस्था सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त२१ जून २०१३ रोजी न्यायालयाने अशोक आंबेडकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर संस्थेवरील मीराताई आंबेडकर यांचा दावा फेटाळण्यात आला असून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ही सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त झाली आहे, असा दावाही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी केला.ज्योतीकर हे विहिंपचे कार्यकर्तेसंस्थेचे विश्वस्त पी.जी. ज्योतीकर हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त असलेला व्यक्ती अगदी विरोधाभासी असलेल्या संस्थेत कसे काय काम करू शकतो. त्यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाला भाजपा व विहिंपच्य दावनीला बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्योतीकर यांना विश्वस्त पदावरून काढण्यासाठी न्यायालयीन कारवाई केली जात असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी केले संस्थेच्या घटनेचे उल्लंघनप्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला भेट दिली. त्यांची ही भेट राजकीय नेता म्हणून योग्य असली तरी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांना या उल्लंघनाबद्दल संस्थेचे सदस्य होता येणार नसल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.