शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
4
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
5
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
6
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
7
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
8
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
9
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
10
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
11
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
12
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
13
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
14
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
15
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
16
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
17
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
18
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
19
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
20
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

अन्याय सहन करू नका!

By admin | Updated: May 24, 2016 02:36 IST

समाजात व कार्यालयात काम करणाऱ्या महिलांनी आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता त्यासाठी पुढे यावे, ...

राज्य महिला आयोगातर्फे कार्यशाळा : विजया रहाटकर यांचे आवाहननागपूर : समाजात व कार्यालयात काम करणाऱ्या महिलांनी आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता त्यासाठी पुढे यावे, आपल्या परिसरातील नगरसेवक किंवा एखाद्या स्वयंसेवी पदाधिकाऱ्याची मदत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल कराव्यात. कायद्याची अंमलबजावणी जलद गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने सहकार्य करावे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून नागपूर येथे महानगरपालिकेच्या महाल येथील राजे तेजसिंगराव भोसले सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व आठही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना विजया रहाटकर म्हणाल्या, आयोगाकडे राज्यातील पाच लाख प्रकरणे प्रलंबित असून सुनावणीची १५०० प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आयोगाच्या माध्यमातून राज्यात विभागीय कार्यशाळा व सुनावणी करणार आहे.महिला आयोगाचा उद्देश राज्यातील दऱ्याखोऱ्यात, पाड्या व तांड्यावर राहणाऱ्या वंचित महिलेला न्याय मिळावा हा असून तिला न्याय्य हक्कासाठी मुंबईला येणे शक्य होत नाही, त्यामुळे अशा कार्यशाळा व सुनावणीच्या माध्यमातून जास्तीतजास्त महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, संरक्षण अधिकारी, एनजीओ व नगरसेवक यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे,अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अपर्णा कोल्हे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कुटुंबात ‘किचन डेमोक्रसी’वर चर्चा व्हावीयावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, पुरुषप्रधान संस्कृतीत समाजमनावरील परिणाम कमी करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात विशाखा समित्या स्थापन कराव्यात, प्रत्येक कार्यालय प्रमुखाने महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेण्याची आवश्यकता आहे.महिलांना अधिकार आणि हक्क समजून देण्याचे काम समुपदेशकांनी करावे. यासाठी संवेदनशीलता महत्त्वाची आहे. यानंतर पुरुषांसाठीसुद्धा वेगळी कार्यशाळा आयोगाने घ्यावी. यापुढे कुटुंबात ‘किचन डेमोक्रसी’ची चर्चा होण्याची गरज आहे. त्यामुळे कुटुंबातील चित्र व संस्कार बदलू शकेल, असेही ते म्हणाले.