शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

संघटित होऊ न संघाची ‘नीती’ हाणून पाडा

By admin | Updated: January 12, 2015 01:05 IST

२०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे.

मंथन-चर्चा : दलित हत्याकांडावर आरएसएस ‘मौन’ का?नागपूर : २०१४ च्या निवडणुकीपर्यंत हिंदू राष्ट्राची भाषा होत नव्हती, आता ती होत आहे. परंतु असे झाले तर देशावर भयंकर संकट येईल. ते कोणत्याही परिस्थितीत रोखले पाहिजे. यासाठी अभ्यास करून व संघटित होऊ न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नीती दलित समाजाने हाणून पाडावी, असे आवाहन प्रा. भाऊ लोखंडे यांनी रविवारी केले. हिंदी मोरभवन येथे आयोजित देशातील दलित हत्याकांडावर आरएसएस मौन का? या मंथन-चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते.देशातील बहुसंख्यक लोकांचा धाक अल्पसंख्यक लोकांच्या मनात नसावा. परंतु आज देशातील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू सुरक्षित तर देश सुरक्षित असा प्रचार चालविला आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येताच हिंदुत्वाची भाषा सुरू झाली आहे. देशाची एकात्मता व अखंडतेसाठी हा धोक्याच्या इशारा असल्याचे त्यांनी सांतिगले. सत्तेवर येताच भाजप व संघाने हिंदू राष्ट्राची भाषा सुरू केली आहे. यापासून देशाला धोका आहे. याचा विरोध करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. क ोणताही चमत्कार रात्रीतून घडत नसतो. चळवळ ही मांजराच्या पावलाने चालत असते. भविष्याचा विचार करताना इतिहासही विसरता येणार नाही,असे रणजित मेश्राम म्हणाले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नंतरच्या ६६ वर्षांच्या काळात संघाच्या लोकांनी अपमान सहन केला. सत्ता परिवर्तनासाठी त्यांना इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. देशाची फाळणी झाली तेव्हा लाखो लोकांचे बळी गेले होते. परंतु त्याही वेळी देशातील अल्पसंख्यक लोकांना असुरक्षित वाटत नव्हते. कारण सत्ता संघाच्या हातात नव्हती. देशातील सत्ता परिवर्तनासाठी दलित समाजालाही प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. संदीप नंदेश्वर, दिनेश अंडरसहारे व अशोक सरस्वती आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनायक जामगडे यांनी तर संचालन निरंजन वासनिक यांनी केले.(प्रतिनिधी)कार्यक्र मात चप्पल भिरकावलीप्रा. प्रवीण कांबळे व अशोक सरस्वती यांनी आपल्या भाषणातून एकमेकांवर टीका केली. यातून प्रकरण हमरीतुमरीवर आले. रागाच्या भरात कांबळे उभे झाल्याने भाषण देत असलेले सरस्वती यांनी त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. यामुळे काही वेळ कार्यक्रमात गोंधळ उडाला होता.