शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घाबरू नका;निर्भीड बना!

By admin | Updated: August 14, 2016 02:34 IST

आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येतात, चढ-उतार येतात. यात प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही.

शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप : नाना पाटेकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला नागपूर : आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येतात, चढ-उतार येतात. यात प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणारच असे नाही. मात्र त्यामुळे निराश होऊ नका. नेहमी छान हसा. शिवाय कधीही कशालाही घाबरू नका, निर्भीड बना. परिणामाची भीती बाळगू नका, असा उपदेश प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केला. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्यावतीने १० ते १३ आॅगस्ट दरम्यान नागपुरात घेण्यात आलेल्या ‘शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा’ शनिवारी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. मंचावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, केशवराव मानकर व राजीव हडप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी विद्यार्थ्यांनी ‘हमर पारा; तुमर पारा आणि रेला...रेला...’ या लोकप्रिय आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते आदर्श पर्यवेक्षक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी नाना पाटेकर यांनी एकलव्य एकल विद्यालय ही एक शाळा नसून, संस्कार देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावत असतो, आणि परतीच्या वेळी लक्षात येते की, सर्व व्यर्थ आहे. जोपर्यंत आपला देश हा आपल्याला आपले कुटुंब वाटत नाही, तोपर्यंत जगण्याची गंमतच येत नाही. त्यामुळे संपूर्ण देश हा आपले कुटुंब समजून काम करण्याची गरज आहे. आदिवासी क्षेत्रातील तरुण नक्षलवादी का झाले, त्यांना असे करावेसे का वाटले. नक्कीच त्याच्या पाठीमागे काही तरी कारणे असतील. ती कारणे शोधून काढली पाहिजे. नुसते एक दुसऱ्यांना मारून चालणार नाही, तर त्यावर समाधान शोधले पाहिजे. आजपर्यंत मला मिळालेल्या सर्व पुरस्कारापेक्षा आजच्या कार्यक्रमात मला मिळालेले समाधान सर्वांत मोठे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वीरेंद्र अंजनकर यांनी केले. तर प्रशांत बापर्डीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) आदिवासी क्षेत्रात काम करण्याची गरज आजही आदिवासी क्षेत्रातील स्थिती फार चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी शिक्षक आहे, तर शाळा नाही. आणि शाळा आहेत, तर शिक्षक नाही. तसेच अनेक गावांत डॉक्टर आहे, तर दवाखाने नाहीत, आणि दवाखाने आहेत, तर डॉक्टर नाही. असे चित्र दिसून येते. मात्र अशाही स्थितीत आदिवासी खडतर जीवन जगत आहे. ते विकासापासून कोसो दूर आहेत. अशा या लोकांसाठी मनात संवेदना ठेवून काम करण्याची गरज आहे. जेथे अंधार आहे, तेथे प्रकाश पोहोचला पाहिजे. मात्र हे काम करताना मनात उपकाराची भावना असू नये. शिवाय त्याचा राजकीय फायदाही घेऊ नये. केवळ सामाजिक जाणिवेतून ही कामे झाली पाहिजे. या भावनेतून कार्यकर्ते जेव्हा एकत्रित येतात, त्यातून चांगले काम घडत असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आदिवासी क्षेत्रापर्यंत विकास पोहोचू शकलेला नाही. तेथे गरिबी, भूकमारी व बेरोजगारी सारख्या समस्या आहेत. आणि त्यातूनच नक्षलवाद पुढे आला आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांच्या मदतीने आदिवासी क्षेत्रात प्रकल्प उभारण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तसेच सॉईल हेल्थ कार्डप्रमाणे या आदिवासी क्षेत्रातील लोकांना आरोग्य कार्ड मिळाले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. आदर्श शिक्षक-पर्यवेक्षकांचा गौरव यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते एकलव्य एकल विद्यालयासाठी आदिवासी क्षेत्रात शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून काम करीत असलेल्या काही लोकांना आदर्श शिक्षक व पर्यवेक्षक पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यात आदर्श पर्यवेक्षक म्हणून रवी भोयर आणि जानराव बेलसरे तर आदर्श शिक्षक म्हणून किशोर गुरले, ममता सूर्यवंशी, अशोक भारवे, संदीप भांडेकर व सुरेश दर्ओ यांचा समावेश होता.