शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील घोटाळ्याचे खटले वेगात निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य व राज्याबाहेरील ४२ हजार ७७० गुंतवणूकदारांना ११०० कोटी रुपयांनी लुबाडणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ...

नागपूर : राज्य व राज्याबाहेरील ४२ हजार ७७० गुंतवणूकदारांना ११०० कोटी रुपयांनी लुबाडणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे पदाधिकारी व इतर आरोपींविरुद्धचे बुलडाणा व अमरावती जिल्ह्याशी संबंधित दोन खटले वेगात निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जळगाव येथील एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाला दिले.

२ मे २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने राज्यातील विविध सत्र न्यायालयांमध्ये प्रलंबित या घोटाळ्याशी संबंधित सर्व खटले जळगाव येथील एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, या न्यायालयात ८० खटले स्थानांतरित करण्यात आले आहेत. तसेच, अभियोग पक्षाने ४ हजार ७२२ साक्षीदारांची यादी दिली आहे आणि हजारो पानांचा ऑडिट रिपोर्ट व इतर रेकॉर्ड दाखल केला आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नागपूर खंडपीठाने या घोटाळ्यात आरोपी असलेल्या १८ संचालकांविरुद्धचे बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील दोन गुन्हे रद्द करण्यास नकार देऊन त्यांच्याविरुद्धचे खटले १५ जूनपर्यंत निकाली काढण्याचा आदेश दिला होता. परंतु, सीआयडीने एका गुन्ह्यात अद्याप आरोपपत्र दाखल केले नाही. तसेच, दुसऱ्या गुन्ह्यात आरोप निश्चित करण्यात आले, पण लॉकडाऊनमुळे नियमित कामकाज होऊ न शकल्यामुळे निर्णय देणे शक्य झाले नाही. करिता, विशेष सत्र न्यायालयाने हे खटले निकाली काढण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याकरिता नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला होता. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी संबंधित बाबी लक्षात घेता विशेष सत्र न्यायालयाची अडचण योग्य असल्याचे नमूद करून हा अर्ज मंजूर केला. तसेच, सत्र न्यायालयाला पुन्हा नवीन तारीख निश्चित करून न देता संबंधित खटले वेगात निकाली काढण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. राज्यामध्ये या सोसायटीच्या तब्बल २२० शाखा कार्यरत होत्या. घोटाळ्याचा तपास राज्य सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

-------------------

या आरोपींना करायचे होते गुन्हे रद्द

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी आरोपी संचालक अंजली गोविंद संत (३०), संजय रमेश तायडे (३५), मयुरी मनोहर शेगोकर (२६), प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५५), दिलीप कांतीलाल चोरडिया (५१), मोतीलाल ओंकार जिरी (४५), प्रमिला मोतीलाल जिरी (३८, सूरजमल बाबुमल जैन (५१), दादा रामचंद्र पाटील (५८), राजाराम काशीनाथ कोळी (४८), भगवान हिरामण वाघ (६४), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५०), इंद्रकुमार आत्माराम लालवानी (४८), शेख रमजान शेख अब्दुल नबी (५२), ललिता राजू सोनवाने (४५), भागवत संपत माळी (६१), सुखलाल शहादू माळी (४५) व यशवंत ओंकार जिरी यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिका १५ फेब्रुवारी २०२१ रोजी फेटाळण्यात आल्या होत्या.