शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

रायसोनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील घोटाळ्याचे खटले वेगात निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य व राज्याबाहेरील ४२ हजार ७७० गुंतवणूकदारांना ११०० कोटी रुपयांनी लुबाडणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ...

नागपूर : राज्य व राज्याबाहेरील ४२ हजार ७७० गुंतवणूकदारांना ११०० कोटी रुपयांनी लुबाडणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे पदाधिकारी व इतर आरोपींविरुद्धचे बुलडाणा व अमरावती जिल्ह्याशी संबंधित दोन खटले वेगात निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जळगाव येथील एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाला दिले.

२ मे २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने राज्यातील विविध सत्र न्यायालयांमध्ये प्रलंबित या घोटाळ्याशी संबंधित सर्व खटले जळगाव येथील एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, या न्यायालयात ८० खटले स्थानांतरित करण्यात आले आहेत. तसेच, अभियोग पक्षाने ४ हजार ७२२ साक्षीदारांची यादी दिली आहे आणि हजारो पानांचा ऑडिट रिपोर्ट व इतर रेकॉर्ड दाखल केला आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नागपूर खंडपीठाने या घोटाळ्यात आरोपी असलेल्या १८ संचालकांविरुद्धचे बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील दोन गुन्हे रद्द करण्यास नकार देऊन त्यांच्याविरुद्धचे खटले १५ जूनपर्यंत निकाली काढण्याचा आदेश दिला होता. परंतु, सीआयडीने एका गुन्ह्यात अद्याप आरोपपत्र दाखल केले नाही. तसेच, दुसऱ्या गुन्ह्यात आरोप निश्चित करण्यात आले, पण लॉकडाऊनमुळे नियमित कामकाज होऊ न शकल्यामुळे निर्णय देणे शक्य झाले नाही. करिता, विशेष सत्र न्यायालयाने हे खटले निकाली काढण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याकरिता नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला होता. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी संबंधित बाबी लक्षात घेता विशेष सत्र न्यायालयाची अडचण योग्य असल्याचे नमूद करून हा अर्ज मंजूर केला. तसेच, सत्र न्यायालयाला पुन्हा नवीन तारीख निश्चित करून न देता संबंधित खटले वेगात निकाली काढण्याचे प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. राज्यामध्ये या सोसायटीच्या तब्बल २२० शाखा कार्यरत होत्या. घोटाळ्याचा तपास राज्य सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

-------------------

या आरोपींना करायचे होते गुन्हे रद्द

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी आरोपी संचालक अंजली गोविंद संत (३०), संजय रमेश तायडे (३५), मयुरी मनोहर शेगोकर (२६), प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५५), दिलीप कांतीलाल चोरडिया (५१), मोतीलाल ओंकार जिरी (४५), प्रमिला मोतीलाल जिरी (३८, सूरजमल बाबुमल जैन (५१), दादा रामचंद्र पाटील (५८), राजाराम काशीनाथ कोळी (४८), भगवान हिरामण वाघ (६४), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५०), इंद्रकुमार आत्माराम लालवानी (४८), शेख रमजान शेख अब्दुल नबी (५२), ललिता राजू सोनवाने (४५), भागवत संपत माळी (६१), सुखलाल शहादू माळी (४५) व यशवंत ओंकार जिरी यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. त्या याचिका १५ फेब्रुवारी २०२१ रोजी फेटाळण्यात आल्या होत्या.