शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ बाय ७ सुरू ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले, धरणे, तसेच तलाव याबाबत योग्य खबरदारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले, धरणे, तसेच तलाव याबाबत योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमु‌ळे पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पशुधन, शेती व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या वर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सुरू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने आंतरराज्य संपर्क व समन्वयदेखील वाढविला गेला पाहिजे. पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामग्रीही जिल्हा प्रशासनाकडे आहे. राज्य सरकारकडून नुकत्याच १० रबर बोटी पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३८१ पूरप्रवण गावात निवारागृहे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मार्ग आदी बाबीही तपासून घेण्यात आल्या आहेत. पुरात पाण्याखाली जाणारे रस्ते व पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय हेलिपॅड उभारण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तोतलाडोहच्या साठ्याकडे विशेष लक्ष

मध्य प्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारणत: २४ दिवस लागतात. तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात पाणी येण्यास ३ ते ४ तास तर नवेगाव खैरीतून पेंच व कन्हान येथील बीना संगमला येण्यास ५ ते ६ तासांचा वेळ लागतो. मध्य प्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्या वर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती बघता या वर्षी तोतलाडोह ते गोसीखुर्द पाण्याचा प्रवासावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.