शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ बाय ७ सुरू ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले, धरणे, तसेच तलाव याबाबत योग्य खबरदारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यामधील नदी-नाले, धरणे, तसेच तलाव याबाबत योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमु‌ळे पूरपरिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पशुधन, शेती व मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या वर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास सुरू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने आंतरराज्य संपर्क व समन्वयदेखील वाढविला गेला पाहिजे. पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामग्रीही जिल्हा प्रशासनाकडे आहे. राज्य सरकारकडून नुकत्याच १० रबर बोटी पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३८१ पूरप्रवण गावात निवारागृहे, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मार्ग आदी बाबीही तपासून घेण्यात आल्या आहेत. पुरात पाण्याखाली जाणारे रस्ते व पुलांची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असून धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय हेलिपॅड उभारण्यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तोतलाडोहच्या साठ्याकडे विशेष लक्ष

मध्य प्रदेशातील चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यास ते पाणी तोतलाडोह धरणात येण्यास साधारणत: २४ दिवस लागतात. तोतलाडोह धरणातून नवेगाव खैरी प्रकल्पात पाणी येण्यास ३ ते ४ तास तर नवेगाव खैरीतून पेंच व कन्हान येथील बीना संगमला येण्यास ५ ते ६ तासांचा वेळ लागतो. मध्य प्रदेशातील पाऊस व त्यातून गेल्या वर्षी उद्भवलेली पूरपरिस्थिती बघता या वर्षी तोतलाडोह ते गोसीखुर्द पाण्याचा प्रवासावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.