लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहरातील मध्य व इतर भागात काही जीर्ण इमारती आहेत. त्या इमारतींच्या शेजारी नागरिकांचे वास्तव्य असून, सतत वर्दळ असते. पावसामुळे या इमारती किंवा त्यांच्या भिंती काेसळून प्राणहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन यावर ताेडगा काढणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
खापा (ता. सावनेर) हे फार जुने शहर असून, शहरात काही कालबाह्य झालेल्या इमारती आहेत. यातील बहुतांश इमारतींमध्ये मालक अथवा किरायेदारांचे वास्तव्य आहे. या माेडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी करणे आवश्यक असताना संबंधितांनी आर्थिक परिस्थती व अन्य कारणामुळे याकडे आजवर लक्ष दिले नाही. यावर्षी भरपूर पाऊस काेसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे सततच्या पावसामुळे या इमारती अथवा त्यांच्या भिंती कधीही काेसळू शकतात.
यातून प्राणहानी हाेण्याची शक्यता बळावल्याने पालिका प्रशासनाने पुढाकार घेत या इमारतीच्या मालकांना सूचना देत त्या खाली करायला लावाव्या, त्यानंतर त्या जमीनदाेस्त कराव्या. त्यासाठी त्यांना नाेटीस द्याव्या. मालक ही कामे करीत नसल्याने पालिका प्रशासनाने या इमारती जमीनदाेस्त कराव्या. एवढेच नव्हे तर आदेशाचे पालन न करणाऱ्या इमारत मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही शहरातील नागरिकांनी केली आहे.
...
केवळ भिंती उभ्या
खापा शहरातील बाजार चाैकात एका घराच्या केवळ भिंती उभ्या आहेत. मुख्य मार्गालगत असलेल्या या घराला लागून किराणा दुकान व घरे आहेत. हा भाग बाजाराचा असल्याने येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. शिवाय, परिसरातील मुलेही या ठिकाणी अधूनमधून खेळतात व फिरतात. या भिंती काेसळून अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.