शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जाच हवा

By admin | Updated: August 26, 2015 03:06 IST

राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते.

आमदारांची एकमुखी मागणी : डीपीसीत करणार मागणीनागपूर : राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा सवाल करीत आंबेडकरी जनतेने शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असताना आता लोकप्रतिनिधींनीही दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच हवा, अशी मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अशा स्वरूपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी केली जाईल, असेही आमदारांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे आ. सुधाकरराव देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला दर्जा देताना काही निकष लावले जातात. वर्षाला एक लाख लोक भेट देत असतील तर ‘क’ वर्ग, चार लाख लोक भेट देत असतील तर ‘ब’ वर्ग व त्यावर असेल तर ‘अ’ वर्ग करण्याची प्रक्रिया करावी लागते. टप्प्याटप्प्याने तसा प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा लागतो. राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. दीक्षाभूमीवर एकाच दिवशी १० ते १५ लाख लोक येतात. इतर वेळीही देश-विदेशातील अनुयायी येथे भेट देतात. नागपुरातील हे एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये सादर करून मंजूर करण्याची मागणी केली जाईल. राज्य सरकार या प्रस्तावाची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनीही ‘अ’ वर्ग देण्याचे समर्थन केले. दीक्षाभूमी, ताजबाग, टेकडी गणेश मंदिर या तिन्ही स्थळांवर लाखो लोक येतात. पर्यटन व ऐतिहासिक स्थळांच्या यादीतही यांचा समावेश आहे. दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्यात काही प्रशासकीय अडचणी असतील तर राज्य सरकारने त्या दूर कराव्यात. गरजेनुसार तरतुदींमध्ये सुधारणा करावी. दीक्षाभूमी हे देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे, असेही खोपडे म्हणाले. आ. सुधाकर कोहळे म्हणाले, शासनातर्फे कोणत्याही संस्थेला टप्प्याटप्प्याने वाढीव दर्जा दिला जातो. दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. राज्य सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा द्यावा. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने दीक्षाभूमीला दर्जा देण्याबाबत विचारही केला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. येत्या काळात सरकारतर्फे निश्चितच ‘अ’ वर्ग दर्जा दिला जाईल. आपण त्यासाठी पाठपुरावा करू.