शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जाच हवा

By admin | Updated: August 26, 2015 03:06 IST

राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते.

आमदारांची एकमुखी मागणी : डीपीसीत करणार मागणीनागपूर : राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा सवाल करीत आंबेडकरी जनतेने शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असताना आता लोकप्रतिनिधींनीही दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच हवा, अशी मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अशा स्वरूपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी केली जाईल, असेही आमदारांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे आ. सुधाकरराव देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला दर्जा देताना काही निकष लावले जातात. वर्षाला एक लाख लोक भेट देत असतील तर ‘क’ वर्ग, चार लाख लोक भेट देत असतील तर ‘ब’ वर्ग व त्यावर असेल तर ‘अ’ वर्ग करण्याची प्रक्रिया करावी लागते. टप्प्याटप्प्याने तसा प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा लागतो. राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. दीक्षाभूमीवर एकाच दिवशी १० ते १५ लाख लोक येतात. इतर वेळीही देश-विदेशातील अनुयायी येथे भेट देतात. नागपुरातील हे एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये सादर करून मंजूर करण्याची मागणी केली जाईल. राज्य सरकार या प्रस्तावाची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनीही ‘अ’ वर्ग देण्याचे समर्थन केले. दीक्षाभूमी, ताजबाग, टेकडी गणेश मंदिर या तिन्ही स्थळांवर लाखो लोक येतात. पर्यटन व ऐतिहासिक स्थळांच्या यादीतही यांचा समावेश आहे. दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्यात काही प्रशासकीय अडचणी असतील तर राज्य सरकारने त्या दूर कराव्यात. गरजेनुसार तरतुदींमध्ये सुधारणा करावी. दीक्षाभूमी हे देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे, असेही खोपडे म्हणाले. आ. सुधाकर कोहळे म्हणाले, शासनातर्फे कोणत्याही संस्थेला टप्प्याटप्प्याने वाढीव दर्जा दिला जातो. दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. राज्य सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा द्यावा. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने दीक्षाभूमीला दर्जा देण्याबाबत विचारही केला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. येत्या काळात सरकारतर्फे निश्चितच ‘अ’ वर्ग दर्जा दिला जाईल. आपण त्यासाठी पाठपुरावा करू.