शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:10 IST

नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची ...

नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची जास्त विक्री होते. याचा फायदा घेत व्यापारीही मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे कमी मनुष्यबळ म्हणजेच नागपूर जिल्ह्यासाठी केवळ दहा अन्न सुरक्षा अधिकारी असल्यामुळे ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात अधिकारी कुठे कुठे कारवाई करणार, हा गंभीर प्रश्न आहे. आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ अगदीच कमी असल्यामुळे अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. सणांच्या काळात भेसळ करणारे व्यापारी का सक्रिय होतात आणि त्यांची दुकाने सील का करीत नाहीत, असाही नागरिकांचा प्रश्न आहे.

आठ महिन्यांत अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले ३६७ नमुने, ४६ असुरक्षित

यावर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून ३६७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व नमुने शासकीय आणि विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी १२२ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले. याशिवाय १९ नमुने अप्रमाणित, पण सेवन केल्यानंतर शरीराला अपायकारक नसल्याचे आढळून आले. पाच नमुन्यांमध्ये योग्य अन्न घटक दिसून आले नाहीत, तर ४६ नमुने असुरक्षित अर्थात भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. तसेच १७५ नमुन्यांचा प्रयोगशाळेतून अजूनही अहवाल प्राप्त झाला नाही. असुरक्षित भेसळयुक्त नमुने प्राप्त केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

खरेदी करताना काळजी घ्या

ग्राहकांना वर्षभर वस्तू योग्यरीत्या हाताळून खरेदी करण्याची गरज आहे. श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणांना सुरुवात होते. या दरम्यान तेल, दूध, खवा, दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढत होते. या संधीचा फायदा घेत व्यापारी खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी भेसळीची तक्रार केल्यास विभागातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात जास्त भेसळ

सणासुदीच्या काळात हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील तयार खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. तो रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून या काळात तपासणीला वेग दिला जातो.

सणासुदीच्या दिवसांत वाढतात कारवाया

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व अन्नपदार्थांची विक्री वाढते. सोबतच अन्न व औषधी प्रशासन विभागाचा कारवाईचा वेग वाढतो. त्याबरोबर नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे. विभागातर्फे वेळोवेळी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांची माहिती देण्यात येते. नागरिकांना शंका आल्यास थेट विभागाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. विभाग कारवाईसाठी कटिबद्ध आहे.

आनंद महाजन, अन्न सुरक्षा अधिकारी.