शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:10 IST

नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची ...

नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची जास्त विक्री होते. याचा फायदा घेत व्यापारीही मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे कमी मनुष्यबळ म्हणजेच नागपूर जिल्ह्यासाठी केवळ दहा अन्न सुरक्षा अधिकारी असल्यामुळे ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात अधिकारी कुठे कुठे कारवाई करणार, हा गंभीर प्रश्न आहे. आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ अगदीच कमी असल्यामुळे अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. सणांच्या काळात भेसळ करणारे व्यापारी का सक्रिय होतात आणि त्यांची दुकाने सील का करीत नाहीत, असाही नागरिकांचा प्रश्न आहे.

आठ महिन्यांत अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले ३६७ नमुने, ४६ असुरक्षित

यावर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून ३६७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व नमुने शासकीय आणि विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी १२२ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले. याशिवाय १९ नमुने अप्रमाणित, पण सेवन केल्यानंतर शरीराला अपायकारक नसल्याचे आढळून आले. पाच नमुन्यांमध्ये योग्य अन्न घटक दिसून आले नाहीत, तर ४६ नमुने असुरक्षित अर्थात भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. तसेच १७५ नमुन्यांचा प्रयोगशाळेतून अजूनही अहवाल प्राप्त झाला नाही. असुरक्षित भेसळयुक्त नमुने प्राप्त केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

खरेदी करताना काळजी घ्या

ग्राहकांना वर्षभर वस्तू योग्यरीत्या हाताळून खरेदी करण्याची गरज आहे. श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणांना सुरुवात होते. या दरम्यान तेल, दूध, खवा, दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढत होते. या संधीचा फायदा घेत व्यापारी खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी भेसळीची तक्रार केल्यास विभागातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात जास्त भेसळ

सणासुदीच्या काळात हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील तयार खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. तो रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून या काळात तपासणीला वेग दिला जातो.

सणासुदीच्या दिवसांत वाढतात कारवाया

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व अन्नपदार्थांची विक्री वाढते. सोबतच अन्न व औषधी प्रशासन विभागाचा कारवाईचा वेग वाढतो. त्याबरोबर नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे. विभागातर्फे वेळोवेळी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांची माहिती देण्यात येते. नागरिकांना शंका आल्यास थेट विभागाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. विभाग कारवाईसाठी कटिबद्ध आहे.

आनंद महाजन, अन्न सुरक्षा अधिकारी.