शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गर्भावस्थेत मधुमेहाची तपासणी अत्यावश्यक

By admin | Updated: July 28, 2014 01:28 IST

गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो,

डायबेटीज केअर फाऊंडेशन : दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोपनागपूर : गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी येथे दिली. असोसिएशन आॅफ डायबिटीज एज्युकेटर आणि डायबिटीज केअरच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी परिषदेचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.गर्भस्थ शिशु व मातेची काळजी हा परिषदेचा मुख्य विषय होता. डॉ. गुप्ता म्हणाले, गर्भावस्थेत मधुमेह होण्याची ५० टक्के शक्यता असते. गर्भावस्थेत या व्याधीचे निदान न झाल्यास बाळाला विकृती किंवा मृत्यू येऊ शकतो. परंतु निदान झाल्यावर हे टाळणे सहज शक्य आहे. काही महिलांमध्ये बाळंतपणानंतर मधुमेह दूर होतो. मात्र, त्यातल्या काही मातांना वयाच्या साधारण ४० व्या वर्षी ही व्याधी घेरण्याची शक्यता असते. यामुळे निदान झालेल्या गर्भवती आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाय सुरू करू शकतात. आहार आणि औषधोपचारातून ती माता मधुमेहाला दूर ठेवू शकते. विशेष म्हणजे, बाळंतपणानंतर मधुमेह असलेल्या माताने बाळाल दूध पाजल्यास त्याला किशोरावस्थेत लठ्ठपणा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊन मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गर्भावस्थेत प्रत्येक तीन-तीन महिन्यानंतर मधुमेहाची चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे निदान होऊन मधुमेहाला प्रतिबंध घालणे शक्य आहे. शासनानेही या संदर्भात पुढाकार घेतला आहे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना गर्भावस्थेत इतर चाचण्यांसोबतच मधुमेहाची चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय रुग्णालयात तशा सोयीही उपलब्धही करून दिल्या आहेत. याची जनजागृती झाल्यास आणि गर्भवतींनी स्वत:हून याची चाचणी करून घेतल्यास आणि सतर्क राहिल्यास पोलिओसारखेच मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते.दोन दिवसीय या परिषदेत एकूण १० वैज्ञानिक चर्चा आणि ३० हून अधिक व्याख्यानांमधून विषयतज्ज्ञ मधुमेहाच्या क्षेत्रात जगभर सुरू असलेल्या संशोधनावर प्रकाश टाकला. त्यासाठी ३५० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. समर बॅनर्जी (कोलकाता), डॉ. सी. एस. याज्ञिक (पुणे), डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू), डॉ. शशांक जोशी (मुंबई), डॉ. अजय कुमार (पटणा), डॉ. शैलजा काळे (पुणे), डॉ. उदय थानावाला (मुंबई), डॉ. बन्सी साबू (अहमदाबाद), डॉ. अनुजा माहेश्वरी (लखनौ), डॉ. शोभा गुडी (बंगळूर) यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)