शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

धोबीघाट तुटले, पण नळ कायम

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

मेयो रुग्णालयाच्या मागच्या बाजूला इंग्रजांच्या काळात धोबीघाट बांधण्यात आला होता. घाटावर आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नंतर नळही जोडून देण्यात आले होते.

हजारो लिटर पाणी दररोज जातेय वाया नागपूर : मेयो रुग्णालयाच्या मागच्या बाजूला इंग्रजांच्या काळात धोबीघाट बांधण्यात आला होता. घाटावर आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नंतर नळही जोडून देण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी धोबीघाट तोडण्यात आला. परंतु त्यावरील नळाचे कनेक्शन मात्र अजूनही बंद झालेले नाही. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या नळावरून परिसरातील लोक पाणी भरतात. परंतु नळाला तोटी नसल्याने दिवसभर पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरात पाणी साचल्याने स्थानिकांनाही त्रास होत आहे. वाया जात असलेले पाणी रोखण्यासाठी येथील काही नागरिकांनी नळाला तोटी लावण्याची मागणी केली आहे. काही जणांनी तर नळ कनेक्शन बंद करण्याची मागणी केली आहे. हा नळ महापालिकेचा असून, तो सार्वजनिक आहे. मनपाच्या निर्देशानुसार ओसीडब्ल्यू हा नळ बंद करू शकते. परंतु याकडे कुणाचेच लक्ष नाही. शहरातील अनेक भागांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत या भागात हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. यासंबंधात माजी उपमहापौर जैतुनबी अन्सारी यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रार केली आहे. परंतु त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. परिसरात पाणी साचून असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे. दुर्गंधीसुद्धा परत आहे. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)