शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
3
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
4
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
5
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
6
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
7
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
8
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
9
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
10
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
11
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
12
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
15
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
16
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
17
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
18
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
19
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
20
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ

विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत

By admin | Updated: September 10, 2016 02:17 IST

नागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)

विश्वराज समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे मतनागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ‘आॅरेंज सिटी वॉटर’चे (ओसीडब्ल्यू) सहकार्य लाभले आहे. या पार्श्वभूमीवर विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांची विशेष मुलाखत.नागपूर : सरकार कुणाचेही आले तरीही लोकसहभाग असलेली विकासाची कामे कधीही थांबत नाहीत. कोणत्याही भागात कामे सुरू करण्यापूर्वी मोहल्ला बैठक आवश्यक आहे. आम्हीसुद्धा कामे करताना जलमित्र निवडतो. ‘पीपीपी’ ऐवजी आता ‘पीपीपीपी’मधील चौथा ‘पी’ म्हणजे लोकसहभाग. त्या माध्यमातून कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत, असे मत विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.लखानी म्हणाले, २४ बाय ७ ही योजना यशस्वीरीत्या राबवित आहे. अन्य जिल्ह्यामध्ये ही योजना बंद पडली आहे. नागपुरात चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू आहे. त्याचा उपयोग नागरिकांना होणार आहे. यासाठी वर्धा रोडवर उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक बंद होईल. त्यासाठी त्या परिसरातील नागरिकांना याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दूर होईल, असे लखानी म्हणाले.२४ बाय ७ योजना राबविण्यापूर्वी ‘माय सिटी माय वॉटर’ ही योजना नागपुरातील शाळांमध्ये राबविली. याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. जलसंवाद सुरू केला. नागरिकांशी संवाद साधून योजनेंतर्गत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविल्याही. आता २४ बाय ७ योजना यशस्वीरीत्या सुरू असून नागपूर कार्यक्षेत्र असल्याचे लखानी म्हणाले. संस्कृती आणि आर्टवर बोलताना लखानी म्हणाले, देशपांडे आणि धनवटे सभागृह सोडल्यास नागपुरात चांगले सभागृह नाही. नवीन सभागृहांची निर्मिती व्हावी. नागनदी स्वच्छतेवर ते म्हणाले, यावर्षीच्या पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचले नाही. याचे मुख्य कारण हे की, पावसाळ्यापूर्वी नागनदी स्वच्छ केली. शहरात बगिच्यांची चांगली देखरेख होत असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी विकासावर लखानी म्हणाले, झोपडपट्टीमध्ये अनेक अडचणी आहेत. सरकारने प्रयत्न केले पाहिजे. कारण ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. त्यांच्या अडचणी संवादाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात. आपल्याकडे एखादा प्रकल्प पूर्ण व्हायला तीन ते चार वर्ष लागतात. प्रकल्प युजर फ्रेंडली कसा होईल, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित व्हावी, असे लखानी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कामासाठी मनपा आणि नासुप्रने विशेष सेल स्थापन करावा, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)