शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत

By admin | Updated: September 10, 2016 02:17 IST

नागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)

विश्वराज समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे मतनागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ‘आॅरेंज सिटी वॉटर’चे (ओसीडब्ल्यू) सहकार्य लाभले आहे. या पार्श्वभूमीवर विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांची विशेष मुलाखत.नागपूर : सरकार कुणाचेही आले तरीही लोकसहभाग असलेली विकासाची कामे कधीही थांबत नाहीत. कोणत्याही भागात कामे सुरू करण्यापूर्वी मोहल्ला बैठक आवश्यक आहे. आम्हीसुद्धा कामे करताना जलमित्र निवडतो. ‘पीपीपी’ ऐवजी आता ‘पीपीपीपी’मधील चौथा ‘पी’ म्हणजे लोकसहभाग. त्या माध्यमातून कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत, असे मत विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.लखानी म्हणाले, २४ बाय ७ ही योजना यशस्वीरीत्या राबवित आहे. अन्य जिल्ह्यामध्ये ही योजना बंद पडली आहे. नागपुरात चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू आहे. त्याचा उपयोग नागरिकांना होणार आहे. यासाठी वर्धा रोडवर उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक बंद होईल. त्यासाठी त्या परिसरातील नागरिकांना याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दूर होईल, असे लखानी म्हणाले.२४ बाय ७ योजना राबविण्यापूर्वी ‘माय सिटी माय वॉटर’ ही योजना नागपुरातील शाळांमध्ये राबविली. याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. जलसंवाद सुरू केला. नागरिकांशी संवाद साधून योजनेंतर्गत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविल्याही. आता २४ बाय ७ योजना यशस्वीरीत्या सुरू असून नागपूर कार्यक्षेत्र असल्याचे लखानी म्हणाले. संस्कृती आणि आर्टवर बोलताना लखानी म्हणाले, देशपांडे आणि धनवटे सभागृह सोडल्यास नागपुरात चांगले सभागृह नाही. नवीन सभागृहांची निर्मिती व्हावी. नागनदी स्वच्छतेवर ते म्हणाले, यावर्षीच्या पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचले नाही. याचे मुख्य कारण हे की, पावसाळ्यापूर्वी नागनदी स्वच्छ केली. शहरात बगिच्यांची चांगली देखरेख होत असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी विकासावर लखानी म्हणाले, झोपडपट्टीमध्ये अनेक अडचणी आहेत. सरकारने प्रयत्न केले पाहिजे. कारण ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. त्यांच्या अडचणी संवादाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात. आपल्याकडे एखादा प्रकल्प पूर्ण व्हायला तीन ते चार वर्ष लागतात. प्रकल्प युजर फ्रेंडली कसा होईल, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित व्हावी, असे लखानी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कामासाठी मनपा आणि नासुप्रने विशेष सेल स्थापन करावा, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)