शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कृषीक्षेत्राच्या विकासाला प्राधान्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:44 IST

देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : ‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीयावेळी उपराष्ट्रपतींनी शेतकºयांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरदेखील प्रकाश टाकला. जर पुरेसे पाणी, सिंचन, २४ तास वीज, चांगले रस्ते, बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून दिली तर एकही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी हे शेतकºयांच्या समस्येवरील समाधान नाही. कृषीक्षेत्रातील संशोधनदेखील वाढायला हवे. शिवाय शेतकºयांनीदेखील पारंपरिक प्रणाली व पिकांपासून थोडा वेगळा विचार करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.मराठीतून भाषणाची सुरुवातउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा नागपूरशी जुना संबंध राहिला आहे. सक्रिय राजकारणात असतानादेखील त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली होती. शुक्रवारी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी रटाळ भाषण न करता महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला.