शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

कृषीक्षेत्राच्या विकासाला प्राधान्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:44 IST

देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : ‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीयावेळी उपराष्ट्रपतींनी शेतकºयांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरदेखील प्रकाश टाकला. जर पुरेसे पाणी, सिंचन, २४ तास वीज, चांगले रस्ते, बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून दिली तर एकही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी हे शेतकºयांच्या समस्येवरील समाधान नाही. कृषीक्षेत्रातील संशोधनदेखील वाढायला हवे. शिवाय शेतकºयांनीदेखील पारंपरिक प्रणाली व पिकांपासून थोडा वेगळा विचार करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.मराठीतून भाषणाची सुरुवातउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा नागपूरशी जुना संबंध राहिला आहे. सक्रिय राजकारणात असतानादेखील त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली होती. शुक्रवारी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी रटाळ भाषण न करता महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला.