शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

By admin | Updated: December 27, 2014 03:07 IST

देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन....

नागपूर : देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले.सोमलवार अ‍ॅकेडमी एज्युकेशन सोसायटीच्या ६० व्या संस्थापक दिन कार्यक्रमात शुक्रवारी त्यांचे ‘शिक्षणातून परिपूर्णतेकडे’ विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे संस्थापक गोविंद काशीनाथ उपाख्य अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संस्थापक दिन साजरा करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकर सोमलवार व्यासपीठावर उपस्थित होते.आजच्या काळात इंटरनेटवर माहितीचा महासागर उपलब्ध आहे. हे ज्ञान व्यक्तीला नोकरी मिळवून देत असले तरी जीवनाला परिपूर्ण करण्यात मात्र मागे पडत आहे. विध्वंसक घटनांना ही बाब कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.वैदिक काळातील शिक्षण पद्धतीमध्ये केवळ प्रशिक्षण नव्हते. त्यावेळी माणसे घडविण्याचे कार्य होत होते. आज विविध प्रकारची विद्या उपलब्ध आहे. यातील एक विद्या शिकण्यासाठी एक जन्म अपुरा पडू शकतो. परंतु, यापैकी एकही विद्या जीवन परीपूर्ण करू शकत नाही. जीवनाला परीपूर्ण करू शकेल तेच शिक्षण घेतले पाहिजे. जीवनाच्या परिपूर्णतेशिवाय कोणत्याही ज्ञानाला महत्त्व नाही. आपण बॉम्ब, वाहने, संगणक तयार करायला शिकलो, पण स्वत:वर संयम ठेवण्याची कला आपल्याला आजही येत नाही, अशी खंत पेन्ना यांनी व्यक्त केली. भारत ज्ञानाच्या आनंदात रमणारा देश आहे. जगातील पहिला ग्रंथ वेद भारतात लिहिला गेला. भारतातील ज्ञानच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो हे अनेकांनी मान्य केले आहे, असेही पेन्ना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकाचे सौंदर्य वाढलेनागपूर : तुकडोजी पुतळा चौकाकडून छोटा ताजबागकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आल्याने या चौकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. या सोबतच अजनी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)