शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

By admin | Updated: December 27, 2014 03:07 IST

देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन....

नागपूर : देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले.सोमलवार अ‍ॅकेडमी एज्युकेशन सोसायटीच्या ६० व्या संस्थापक दिन कार्यक्रमात शुक्रवारी त्यांचे ‘शिक्षणातून परिपूर्णतेकडे’ विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे संस्थापक गोविंद काशीनाथ उपाख्य अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संस्थापक दिन साजरा करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकर सोमलवार व्यासपीठावर उपस्थित होते.आजच्या काळात इंटरनेटवर माहितीचा महासागर उपलब्ध आहे. हे ज्ञान व्यक्तीला नोकरी मिळवून देत असले तरी जीवनाला परिपूर्ण करण्यात मात्र मागे पडत आहे. विध्वंसक घटनांना ही बाब कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.वैदिक काळातील शिक्षण पद्धतीमध्ये केवळ प्रशिक्षण नव्हते. त्यावेळी माणसे घडविण्याचे कार्य होत होते. आज विविध प्रकारची विद्या उपलब्ध आहे. यातील एक विद्या शिकण्यासाठी एक जन्म अपुरा पडू शकतो. परंतु, यापैकी एकही विद्या जीवन परीपूर्ण करू शकत नाही. जीवनाला परीपूर्ण करू शकेल तेच शिक्षण घेतले पाहिजे. जीवनाच्या परिपूर्णतेशिवाय कोणत्याही ज्ञानाला महत्त्व नाही. आपण बॉम्ब, वाहने, संगणक तयार करायला शिकलो, पण स्वत:वर संयम ठेवण्याची कला आपल्याला आजही येत नाही, अशी खंत पेन्ना यांनी व्यक्त केली. भारत ज्ञानाच्या आनंदात रमणारा देश आहे. जगातील पहिला ग्रंथ वेद भारतात लिहिला गेला. भारतातील ज्ञानच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो हे अनेकांनी मान्य केले आहे, असेही पेन्ना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकाचे सौंदर्य वाढलेनागपूर : तुकडोजी पुतळा चौकाकडून छोटा ताजबागकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आल्याने या चौकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. या सोबतच अजनी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)