शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

कामठीतील अवैध कत्तलखाना हटवा!

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुर्गंधीचा नागरिकांना त्रासनागपूर : कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या संदर्भात आ. बावनकुळे यांनी सोमवारी अभिषेक कृष्णा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यात जनावरांची विशेषत: गार्इंची क्रूरपणे कत्तल केली जाते. कत्तल केल्यानंतर या जनावरांच्या टाकाऊ अवशेषांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. हे अवशेष कामठी शहरातील बागडोर नाल्यात खुलेआम फेकले जातात. या अवशेषाची दुर्गंधी सुटल्याने त्याचा कामठी छावणीतील जवान व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कत्तलखान्यातील मांसाची शहरातील प्रमुख मार्गाने वाहतूकही केली जाते. या वाहनातील रक्तमिश्रित पाणी रोडवर सांडते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन डॉ. संदीप कश्यप व विवेक मंगतानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निवाडा देताना उच्च न्यायालयाने शहरातील अवैध कत्तलखाने शहराबाहेर हटविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन अभिषेक कृष्णा यांनी बावनकुळे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मनोज चवरे, प्रमोद मानवटकर, बंडू बावनकुळे, श्रीकांत शेंद्रे, विवेक मंगतानी, डॉ. संदीप कश्यप, लालू यादव, गोपाल सिरिया, प्रमेंद्र यादव, रचना बिल्लरवान,, नलिनी रडके, ममता ठाकूर, रंजना कश्यप, सुषमा सिलाम, प्रवीण कोसरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)