शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात विलंब का?

By admin | Updated: July 3, 2016 02:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निकाल लागूनदेखील सुमारे महिनाभरापासून गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा संतप्त सवाल : विविध मागण्यांसाठी नागपूर विद्यापीठावर मोर्चा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निकाल लागूनदेखील सुमारे महिनाभरापासून गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका देण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. ‘लेझर’ प्रणालीमुळे गुणपत्रिकाचे काम रखडल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली होती हे विशेष.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे ४५० हून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. यात अंतिम वर्षांच्या निकालांचादेखील समावेश आहे. या विद्यार्थ्यांसाठी मूळ गुणपत्रिका फार महत्त्वाची असते परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप गुणपत्रिका लागलेल्याच नाही. या मुद्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व जोरदार आंदोलन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली व इतका विलंब का होत आहे, असा संतप्त सवाल केला. याशिवाय २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश क्षमता ३० टक्क्यांनी वाढवावी, मनपा हद्दीतील महाविद्यालयांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यात यावे, परीक्षा सुरू होण्याच्या १५ दिवस अगोदर परीक्षा प्रवेशपत्र वितरित करण्यात यावे, माहिती केंद्राची स्थापना करावी यासारख्या विविध मागण्यादेखील पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी केल्या. केंद्रीय प्रवेश पद्धती, प्रवेश क्षमता वाढ यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, सौरभ मिश्रा, ईश्वर बाळबुधे, महेंद्र भांगे, दिनकर वानखेडे, अ‍ॅड. पंकज डहाके यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.(प्रतिनिधी)जुन्या पद्धतीनेच गुणपत्रिका देणारविद्यापीठाने ‘लेझर प्रिंटर’वर गुणपत्रिका छापण्याचे ठरविले होते. परंतु या प्रणालीत एक एक गुणपत्रिका ‘प्रिंट’ होते. त्यामुळे सगळ्या गुणपत्रिकांच्या ‘प्रिंटींग’ला विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पारंपरिक पद्धतीनेच ‘प्रिंटींग’ करण्यात येत आहे, असे कुलगुरू डॉ. काणे यांनी यावेळी स्पष्ट केले.