शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

नागपूर : ऑगस्टच्या अखेरपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सरासरीपेक्षा अधिक आणि गरजेपेक्षा अतिरिक्त पाऊस झाला असून, जिल्ह्यात ओला दुष्काळाचे सावट पसरले ...

नागपूर : ऑगस्टच्या अखेरपासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सरासरीपेक्षा अधिक आणि गरजेपेक्षा अतिरिक्त पाऊस झाला असून, जिल्ह्यात ओला दुष्काळाचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत १०९ टक्के पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सरकारी नियमानुसार ११० टक्क्याहून अधिक पाऊस झाल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो. तर मंगळवारी सकाळी जिल्हाभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.

खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून संबंधित मागणी केली आहे. तुमाने यांनी पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस काटोल व नरखेड तालुक्यात पडतो. मात्र यावेळी या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय हिंगणा, कळमेश्वर, भिवापूर, कामठी, सावनेर या तालुक्यात ओला दुष्काळाची परिस्थिती आहे. तर उर्वरित सहापैकी नागपूर ग्रामीण, कुही, उमरेड, मौदा या चार तालुक्यांमध्येही ओल्या दुष्काळाचे संकट ओढवणार आहे. तब्बल सात तालुक्यांमध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे तेथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तुमाने यांनी केली आहे.

पिकांचे नुकसान

- मागील २० दिवसात सुमारे ३०० मिमी पाऊस झाला आहे. जमिनीत सतत ओल असल्यामुळे आणि जमिनीतून पाणी पाझरत असल्याने संत्रा, कापूस, सोयाबीन व तुरीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य आहे. याशिवाय अनेक गावात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.