शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

(निर्णयार्थ) थॅलेसेमिया व सिकलसेलच्या निर्मूलनासाठी लस निर्माण व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपल्या देशातील अनेक आजारांसाठी आजपर्यंत लस तयार झाली आहे. मात्र थॅलेसेमिया व सिकलसेल यांच्यासारख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपल्या देशातील अनेक आजारांसाठी आजपर्यंत लस तयार झाली आहे. मात्र थॅलेसेमिया व सिकलसेल यांच्यासारख्या गंभीर आजारांसाठी अद्यापही ठोस उपचार नाहीत. आपल्या देशात या आजारांचे सुमारे ५ कोटी रुग्ण आहेत. या आजारांच्या निर्मूलनासाठी संशोधन करून लस निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून बोलत होते.

पूर्व विदर्भात या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. विकसित नसलेल्या मागास भागात ही संख्या अधिक असल्याचे आढळते. थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याची आवश्यकता होती. सिकलसेलसाठीही वेगळी रक्तपेढी असली पाहिजे व रक्तदात्यांनी या रुग्णांसाठी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

थॅलेसेमिया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटलची संख्या अत्यंत कमी असून या हॉस्पिटलची संख्या कशी वाढेल तसेच औषधांसाठी येणारा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे काय, या रुग्णांच्या औषधांसाठी येणारा खर्च कमी करता येईल, यादृष्टीने अध्ययन करावे लागणार आहे. पंतप्रधान आयुष्यमान योजनेत ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन’चा समावेश करता येईल का व गरीब रुग्णांना ही सवलत देता येईल का यावरदेखील विचार आवश्यक आहे. यावेळी डॉ. विकी रुघवानी, डॉ. विनिता श्रीवास्तव, डॉ. केंद्रे, डॉ. जैन, डॉ. अरोरा व तेजस्विनी उमाळे उपस्थित होते