शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकचा निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने ...

नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे व्यवसायाला गती येईल आणि आर्थिक नुकसान भरून निघेल, असा विश्वास विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केला. राज्य शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यापारी व्यवसाय करतीलच, पण त्यासोबतच ग्राहकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, कोरोना काळात किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत आणि नंतर दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध होते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. पण आता अनलॉकच्या निर्णयामुळे व्यवसायाला गती येऊन ग्राहकांना वेळेनुसार खरेदी करणे शक्य होणार आहे. व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील.

चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री व ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनासोबतच कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्याची व्यापारी व ग्राहकांची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी आणि यंदा दुकाने दोन महिने बंद असल्याने व्यापारी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. आता दुकाने पूर्णवेळ सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गेल्या वर्षी आणि यंदा सणांचे हंगाम बुडाल्याने सराफा व्यापारी संकटात आले आहेत. ग्राहक दागिन्यांची खरेदी प्रत्यक्ष पाहूनच करतो. दुकाने बंद असल्याने ग्राहकांनी खरेदी केली नाही. त्यामुळे सराफांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला. पूर्वीच्या तुलनेत सध्या लग्नाची खरेदी करायला कमी लोक येतात. कोरोना नियम आणि अटींचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यात्या सूचना सराफांना केल्या आहेत.

सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे हुसेन अजानी म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू झाल्यानंतर शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यवसाय करण्यात येणार आहे. दुकानदारांनी तयारी केली आहे. जुना माल विक्रीला काढून सणांमध्ये नवीन मालाची खरेदी करण्यात येणार आहे.

इतवारी ठोक किराणा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार असल्याने बाजारात गर्दी होणार नाही. शिवाय खरेदीही सुलभ होईल. सर्वच दुकानदारांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. ग्राहकांनीही विनाकारण गर्दी करू नये.