शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

अनलॉकचा निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने ...

नागपूर : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होऊ लागताच सोमवार, ७ जूनपासून नागपूर जिल्हा अनलॉक करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे व्यवसायाला गती येईल आणि आर्थिक नुकसान भरून निघेल, असा विश्वास विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केला. राज्य शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यापारी व्यवसाय करतीलच, पण त्यासोबतच ग्राहकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, कोरोना काळात किराणा दुकाने सकाळी ११ पर्यंत आणि नंतर दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध होते. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. पण आता अनलॉकच्या निर्णयामुळे व्यवसायाला गती येऊन ग्राहकांना वेळेनुसार खरेदी करणे शक्य होणार आहे. व्यवसाय सुरळीत होण्यास काही दिवस लागतील.

चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्री व ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनासोबतच कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्याची व्यापारी व ग्राहकांची जबाबदारी आहे. गेल्या वर्षी आणि यंदा दुकाने दोन महिने बंद असल्याने व्यापारी मानसिक आजाराने त्रस्त आहेत. आता दुकाने पूर्णवेळ सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गेल्या वर्षी आणि यंदा सणांचे हंगाम बुडाल्याने सराफा व्यापारी संकटात आले आहेत. ग्राहक दागिन्यांची खरेदी प्रत्यक्ष पाहूनच करतो. दुकाने बंद असल्याने ग्राहकांनी खरेदी केली नाही. त्यामुळे सराफांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय बुडाला. पूर्वीच्या तुलनेत सध्या लग्नाची खरेदी करायला कमी लोक येतात. कोरोना नियम आणि अटींचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यात्या सूचना सराफांना केल्या आहेत.

सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे हुसेन अजानी म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू झाल्यानंतर शासनाचे नियम आणि अटींचे पालन करून व्यवसाय करण्यात येणार आहे. दुकानदारांनी तयारी केली आहे. जुना माल विक्रीला काढून सणांमध्ये नवीन मालाची खरेदी करण्यात येणार आहे.

इतवारी ठोक किराणा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, दुकाने पूर्ण वेळ सुरू राहणार असल्याने बाजारात गर्दी होणार नाही. शिवाय खरेदीही सुलभ होईल. सर्वच दुकानदारांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. ग्राहकांनीही विनाकारण गर्दी करू नये.