शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’चा निर्णय एकतर्फी, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’बाधितांचे आकडे वाढत असल्यामुळे उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषित केला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’बाधितांचे आकडे वाढत असल्यामुळे उपराजधानीत ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घोषित केला. मात्र भाजपकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इतका मोठा निर्णय घेण्याअगोदर भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नाही. हा निर्णय एकतर्फी असून शासन व प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका जनतेला सहन करावा लागतो आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. मात्र या बैठकीला भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. आम्हाला या बैठकीला बोलविण्यातच आले नाही. जनतेशी निगडित इतका मोठा निर्णय विश्वासात न घेता जाहीर करण्यात आला, असे आमदारांनी सांगितले.

लॉकडाऊन पर्याय नाही

मागील ‘लॉकडाऊन’पासून आता जनता सावरते आहे. अशास्थितीत पालकमंत्र्यांनी जनतेवर हा निर्णय लादला आहे. रुग्ण वाढत असताना पालकमंत्री समोर आले नाही. अधिकारी दालनांमध्येच बसून होते. अमरावतीमधील ‘लॉकडाऊन’ अयशस्वी ठरला. या निर्णयामुळे आता छोट्या व्यावसायिकांवर मोठे संकट आले आहे. ‘लॉकडाऊन’ हा काही पर्याय नाही.

- कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर

नियमांचे पालन व्हावे

कोरोनापासून कसेबसे सावरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यापारी व उद्योगासाठी हा लॉकडाऊन धक्कादायक आहे. नियमांचे पालन कसे व्हावे यावर प्रशासन व पालकमंत्र्यांनी भर देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. ‘लॉकडाऊन’ची घोषणा मागे घेऊन नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवी.

-आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप

प्रशासनाने कामच केले नाही

नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्ही याचे समर्थन करीत नाही. वाहतूक खुली, ऑनलाईन मद्यविक्री खुली, शहर बंद आणि ग्रामीण भाग सुरू असे विचित्र नियम लावण्यात आले आहेत. मुळात प्रशासनाने गतीने कामच केले नाही. ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविले नाही.

- गिरीश व्यास, आमदार, विधान परिषद

हा तर हेकेखोरपणाच

‘लॉकडाऊन’ लावण्याचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. कठोर निर्णय घेणे आवश्यक होते, मात्र दंडाची रक्कम वाढवून लोकांना नियमांचे पालन करायला लावता आले असते. अगोदरच सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता परत ‘लॉकडाऊन’ लावल्याने संकट वाढेल. शिवाय यामुळे बाधितांची संख्या कमी होईल का, याबाबतदेखील शाश्वती नाही.

- संदीप जोशी, माजी महापौर

जनतेच्या हिताचा निर्णय भाजपला खुपतोय : पालकमंत्री

पालकमंत्री नितीन राऊत यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. जनतेच्या हितासाठी घेण्यात आलेला निर्णय भाजपा खुपतो आहे. नागरिकांचे प्राण वाचविणे याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी कठोर पावले उचलण्यात येतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले.