शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी ) रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. राज्य सरकारने लोकप्रियता मिळविण्यासाठी तसा अयोग्य निर्णय घेतला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : घोटाळ्यांवर चौकशी समिंत्यांचा केवळ देखावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी ) रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. राज्य सरकारने लोकप्रियता मिळविण्यासाठी तसा अयोग्य निर्णय घेतला. एलबीटी रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाºया ६ ते ७ हजार कोटींच्या महसुलाचे नुकसान होईल. याशिवाय टोल टॅक्स रद्द करणे, सहकारी बँकांचे विलिनीकरण करणे यासारखे महसुल घटविणारे निर्णय घेतल्या गेले.आज सरकारवर सव्वा चार लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. सन २०१४ च्या पूर्वी आघाडी सरकार असताना २.६३ लाख कोटींचे कर्ज होते. महसुलात वाढ करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यात एकामागून एक घोटाळे सुरू आहेत. फक्त दिखाव्यासाठी चौकशी समिती नेमली जाते. नंतर मुख्यमंत्री स्वत:च क्लीन चिट देतात. तीन एकर जमिनीच्या अनियमिततेत एकनाथ खडसे यांना तत्काळ हटविण्यात आले.मात्र, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उद्योग मंत्री सुभाष देसाई, समृद्धी मार्गाचे मोपुलवार यांच्या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, समाधानकारक कार्रवाई झाली नाही. संबंधित प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारच्या मंत्र्यांची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या वेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.नोटाबंदी मोठा घोटाळानोटाबंदीबाबत आपण निराश नाही. मात्र, हा एक मोठा घोटाळा असल्याचा संशय आहे. नोटाबंदीसाठी कोणत्याही प्रकारची कॅबिनेट नोट किंवा आयबीआयच्या बैठकीत अजेंडाही सादर झाला नाही. होऊ शकते याची माहिती फक्त पंतप्रधान मोदी यांनाच असेल. सध्या कॅशलेस व्यवस्थेचा गवगवा केला जात आहे. मात्र, डिजिटल पेमेंट केले असता २ ते ४ टक्के शुल्क कपात केली जाते. ही लूट बंद व्हावी. नियम तयार करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी. अमेरिकेचे राष्टÑपती बराक ओबामा यांनी भारत दौरा करताच क्रेडिट कार्ड कंपन्यांनी डिजिटल पेमेंटची चर्चा सुरू केली होती. संबंधित कंंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.अधिवेशनात शेतकºयांचा मुद्दा उचलणारविदर्भात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू होत आहेत. कर्जाच्या बोझामुळे राज्यभरात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कर्ज माफीच्या नावावर अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. सहकारी बँका संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. राज्य सरकारकडून शेतकºयांचा छळ सुरू आहे. कृषिमंत्री बेपत्ता आहेत. हे सर्व मुद्दे अधिवेशनात लावून धरून सरकारला जाब विचारण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.मित्रपक्षामुळे काँग्रेसचा पराभवविधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला नाही तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन प्रकल्पातत अनियमितता सोबतच इतर काही मुद्यांवर मतभेद झाले. त्यामुळे आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढू शकलो नाहीत. त्यामुळे पराभव झाला. भाजपाला २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ३५.२ टक्के होते. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशी हात मिळविण्याचे संकेत दिले आहेत. याचे चव्हाण यांनी स्वागत केले. भाजप- सेनेत मतभेद असले तरी सरकार पडणार नाही व मध्यावधी निवडणुकाही होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.