शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:15 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी ) रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. राज्य सरकारने लोकप्रियता मिळविण्यासाठी तसा अयोग्य निर्णय घेतला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : घोटाळ्यांवर चौकशी समिंत्यांचा केवळ देखावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी ) रद्द करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. राज्य सरकारने लोकप्रियता मिळविण्यासाठी तसा अयोग्य निर्णय घेतला. एलबीटी रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाºया ६ ते ७ हजार कोटींच्या महसुलाचे नुकसान होईल. याशिवाय टोल टॅक्स रद्द करणे, सहकारी बँकांचे विलिनीकरण करणे यासारखे महसुल घटविणारे निर्णय घेतल्या गेले.आज सरकारवर सव्वा चार लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. सन २०१४ च्या पूर्वी आघाडी सरकार असताना २.६३ लाख कोटींचे कर्ज होते. महसुलात वाढ करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यात एकामागून एक घोटाळे सुरू आहेत. फक्त दिखाव्यासाठी चौकशी समिती नेमली जाते. नंतर मुख्यमंत्री स्वत:च क्लीन चिट देतात. तीन एकर जमिनीच्या अनियमिततेत एकनाथ खडसे यांना तत्काळ हटविण्यात आले.मात्र, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उद्योग मंत्री सुभाष देसाई, समृद्धी मार्गाचे मोपुलवार यांच्या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, समाधानकारक कार्रवाई झाली नाही. संबंधित प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारच्या मंत्र्यांची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या वेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.नोटाबंदी मोठा घोटाळानोटाबंदीबाबत आपण निराश नाही. मात्र, हा एक मोठा घोटाळा असल्याचा संशय आहे. नोटाबंदीसाठी कोणत्याही प्रकारची कॅबिनेट नोट किंवा आयबीआयच्या बैठकीत अजेंडाही सादर झाला नाही. होऊ शकते याची माहिती फक्त पंतप्रधान मोदी यांनाच असेल. सध्या कॅशलेस व्यवस्थेचा गवगवा केला जात आहे. मात्र, डिजिटल पेमेंट केले असता २ ते ४ टक्के शुल्क कपात केली जाते. ही लूट बंद व्हावी. नियम तयार करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी. अमेरिकेचे राष्टÑपती बराक ओबामा यांनी भारत दौरा करताच क्रेडिट कार्ड कंपन्यांनी डिजिटल पेमेंटची चर्चा सुरू केली होती. संबंधित कंंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.अधिवेशनात शेतकºयांचा मुद्दा उचलणारविदर्भात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू होत आहेत. कर्जाच्या बोझामुळे राज्यभरात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कर्ज माफीच्या नावावर अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. सहकारी बँका संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. राज्य सरकारकडून शेतकºयांचा छळ सुरू आहे. कृषिमंत्री बेपत्ता आहेत. हे सर्व मुद्दे अधिवेशनात लावून धरून सरकारला जाब विचारण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.मित्रपक्षामुळे काँग्रेसचा पराभवविधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला नाही तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन प्रकल्पातत अनियमितता सोबतच इतर काही मुद्यांवर मतभेद झाले. त्यामुळे आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढू शकलो नाहीत. त्यामुळे पराभव झाला. भाजपाला २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ३५.२ टक्के होते. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशी हात मिळविण्याचे संकेत दिले आहेत. याचे चव्हाण यांनी स्वागत केले. भाजप- सेनेत मतभेद असले तरी सरकार पडणार नाही व मध्यावधी निवडणुकाही होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.