शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

कर्जमाफी झाली तरी कर्ज वसुलीचा तगादा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

शरद मिरे लोकमत : खरीप हंगामासाठी शेतकऱ्याने बँकेकडे पीककर्जाची मागणी केली. मागणी मंजूरही झाली. मात्र कर्जाची रक्कम तीन ...

शरद मिरे

लोकमत : खरीप हंगामासाठी शेतकऱ्याने बँकेकडे पीककर्जाची मागणी केली. मागणी मंजूरही झाली. मात्र कर्जाची रक्कम तीन टप्प्यात देणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार दोन टप्प्याची रक्कम शेतकऱ्याला मिळाली. मात्र तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित रक्कम देण्याचे टाळले. असे असताना शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर संपूर्ण मंजूर कर्जाची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हे तर कर्जमाफीनंतरसुद्धा उर्वरित रक्कमेचा भरणा करण्यासाठी बँकेने शेतकऱ्याकडे तगादा लावला आहे. हा प्रकार भिवापूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांशी घडला आहे.

तालुक्यातील रोहना येथील शेतकरी मुकुंदा लकडे यांनी पत्नी कमलच्या नावे आयसीआसीआय बँकेच्या जवळी शाखेतून १९ डिसेंबर २०१७ रोजी पीककर्ज घेतले होते. लकडे यांनी सदर बँकेकडे एक लाख ३२ हजार ५०० रुपये कर्जाची मागणी केली होती. बँकेने तेवढे कर्ज मंजूरही केले. कर्जाची रक्कम तीन टप्प्यात देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार बँकेने दोन टप्प्यात ८० हजार रुपये दिले. उर्वरित तिसऱ्या टप्प्यातील कर्जाची रक्कम मागणी करूनही शेतकऱ्याला मिळाली नाही. मात्र कर्जदार शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर संपूर्ण मंजूर कर्जाची रक्कम नोंदविण्यात आली. दरम्यान, शासनाने यावर्षी दाेन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. यात सदर शेतकऱ्याला प्राप्त रक्कम अर्थात ८० हजार रुपये माफ झाले. मात्र सदर बँक व्यवस्थापन शेतकऱ्याला देय न केलेली उर्वरित रक्कम अर्थात ५२ हजार ५०० रुपयाची व्याजासह मागणी करत आहे. कर्जाची जी रक्कम मिळालीच नाही ती रक्कम कशी भरावी, असा प्रश्न‌ शेतकऱ्याला पडला आहे. असा प्रकार मेढा येथील शेतकरी गुंडेराव मोहड यांच्याशीसुद्धा झाला आहे. गुंडेराव यांनी २०१७ मध्ये याच शाखेकडे एक लाख ६२ हजार ५०० रुपये कर्जाची मागणी केली होती. बँकेने तेवढ्या रक्कमेचे कर्ज मंजूरही केले. मात्र मोहड यांनासुद्धा बँक व्यवस्थापनाने दोन टप्प्यात केवळ एक लाख रुपये दिले. उर्वरित‌ कर्जाची रक्कम मागणी करूनही देण्यात आली नाही. मोहड यांच्या सातबाऱ्यावर संपूर्ण कर्ज रक्कमेची अर्थात एक लाख ६२ हजार ५०० रुपयाची नोंद करण्यात आली. कर्जमाफीत त्यांनासुद्धा प्राप्त रक्कम एक लाख रुपये शासनाने माफ केले. त्यानंतर बँक मात्र त्यांना उर्वरित ६२ हजार ५०० रुपयाची व्याजासह मागणी करत आहे. बँकेकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

--

९०० रुपयाची मागणी

कर्जरूपी जी रक्कम मिळालीच नाही, ती आम्ही भरायची कशी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तर उत्तर देण्यास सपशेल अपयशी ठरलेले बँक व्यवस्थापन वसुलीसाठी तगादा लावत आहे. बँकेचे कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी जात त्यांचे दार ठोठावत आहे. कधी ५००, तर कधी ९०० रुपयाची मागणी करत आहे. पैशाची मागणी करणारे हे महाशय कोण आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

चौकशीचे आदेश

यासंदर्भात दोन्ही शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेत तक्रार केली. कांबळे यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत सहायक निबंधकांना चौकशीच्या सूचना दिल्या आहे. कर्जरूपी मंजूर झालेली मात्र प्राप्त न झालेली रक्कम बँकेने तात्काळ द्यावी. शिवाय दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा संपूर्ण लाभ द्यावा, अशी मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.